ऑनलाईन टीम/तरुण भारत
सर्व समाजघटकांसह देशाला एकसंघ ठेवण्याची जबाबदारी देशातील सत्ताधाऱयांची असते. पण 2014 नंतर जाती, धर्मांच्या नावाखाली राजधानी दिल्लीसह देशात दंगली होत आहेत. राज्यकर्त्यांचा संकुचित विचार देशहिताचा नाही. त्यामुळे धर्मांध शक्तींना खडय़ासारखे दूर करून देश एकसंघ ठेवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार शरद पवार यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यव्यापी परिवार संवाद यात्रेचा समारोप कोल्हापूरात झाला. त्यापार्श्वभूमीवर कळंबा येथील तपोवन मैदानावर आयोजित भव्य संकल्प सभेत पवार यांनी कार्यकर्त्यांबरोबरच महाराष्ट्रातील तमाम जनतेला उद्देशून पुरोगामी महाराष्ट्राचा निर्धार व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ,ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुप्रिया सुळे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सामाजिक न्याय व कल्याणमंत्री धनंजय मुंडे आदींसह राज्यातील राष्ट्रवादीचे आमदार, मंत्री, पदाधिकाऱयांसह हजारोंच्या संख्येने राज्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यव्यापी परिवार संवाद यात्रेचा समारोप कोल्हापूरात झाला. त्यापार्श्वभूमीवर कळंबा येथील तपोवन मैदानावर आयोजित भव्य संकल्प सभेत पवार यांनी कार्यकर्त्यांबरोबरच महाराष्ट्रातील तमाम जनतेला उद्देशून पुरोगामी महाराष्ट्राचा निर्धार व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ,ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुप्रिया सुळे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सामाजिक न्याय व कल्याणमंत्री धनंजय मुंडे आदींसह राज्यातील राष्ट्रवादीचे आमदार, मंत्री, पदाधिकाऱयांसह हजारोंच्या संख्येने राज्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.
पवार म्हणाले, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सर्व समाजघटकांना न्याय देऊन देशाच्या प्रगतीची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. पण देशात भाजपची सत्ता आल्यानंतर वेगळे चित्र पहावयास मिळत आहे. देशातील जनतेमध्ये सध्या जाती धर्मांच्या नावावर फुट पाडली जात आहे. गेल्या काही दिवसांत दिल्लीत अनेक दंगली झाल्या. दिल्लीचे गृह खाते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हातात आहे. देशाची राजधानी एक विचाराची राहील याची शहा यांची जबाबदारी आहे. दिल्लीत काय झाले की त्याचा संदेश जगात पोहोचतो. पण तेथील दंगली पाहून देश अस्थिर झाला असल्याचे चित्र जगात निर्माण झाले आहे. भाजपची सत्ता असलेल्या कर्नाटकसह इतर राज्यांमध्ये अल्पसंख्यांकांच्या दुकानात खरेदी करू नये असे फलक लावले जात असून जाती, धर्मात तेढ निर्माण केली जात असल्याची टिका पवार यांनी केली.
….. जगातील नेत्यांना घडवले जाते केवळ गुजरात दर्शन
भारतात नेहमी जगातील नेते येतात. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरसिंगराव, मनमोहनसिंग हे पंतप्रधान असताना देशातील नेते आल्यानंतर साहजिकच ते राजधानी दिल्लीसह अन्य राज्यात जात होते. पण आता मोदी सरकारच्या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, इंग्लंड व चिनचे प्रधानमंत्री आल्यानंतर त्यांना थेट गुजरातमध्ये घेऊन जाण्याचे काम केले जाते. पण देशाचे नेते असणाऱयांनी केवळ एक राज्याचा नव्हे तर देशाचा विचार करायला हवा, असा टोलो पवार यांनी लगावला.
….. तर त्यांना महाराष्ट्र कळला नाही
भाषणामध्ये मी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाही, केवळ शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव घेतो, असा काही जणांकडून आरोप केला जातो. पण शिवराय आमच्या अंतकरणात असून शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव घेणे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे, अशी स्पष्टोक्ती करून जे आरोप करतात त्यांना महाराष्ट्र खऱया अर्थाने कळलाच नाही असा टोला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता पवार यांनी लगावला. देशात अनेक राजवटी झाल्या. पण गेल्या 400 वर्षांपासून केवळ शिवाजी महाराजांचे नाव प्रत्येकाच्या मनामनात आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.