विसर्जनस्थळी निर्माल्य कुंड उभारावेत ः गणेशभक्तांची मागणी
बेळगाव / प्रतिनिधी
गणेशोत्सव काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पूजाअर्चा झाल्यानंतर निर्माल्य पाण्यात विसर्जित केले जाते. त्यामुळे जलप्रदूषणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. गणरायाचा आगमन सोहळा आणि त्यानंतर प्रति÷ापना झाली. शिवाय दीड दिवसाच्या गणरायाला निरोपदेखील देण्यात आला. दरम्यान गणेशमूर्ती विसर्जनाबरोबर निर्माल्यदेखील तलाव, विहिरीतच विसर्जित केले जाते. त्यामुळे गणेशोत्सव काळातील निर्माल्य विसर्जनाचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. याकरिता प्रशासनाने विसर्जनस्थळी निर्माल्य कुंडांची उभारणी करावी, अशी मागणी भक्तांतून होत आहे.
दरवषी केवळ पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी घोषणा होतात. मात्र प्रत्यक्षात प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर केला जातो. याबरोबरच गणेशोत्सव काळात केळीची झाडे, फुले, हार यासह फळे आदींचा वापर अधिक होतो. दरम्यान कार्यक्रमानंतर सर्रास निर्माल्य पाण्यात विसर्जित केले जाते. त्यामुळे जलप्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः ग्रामीण भागातील गणेशभक्तांकडून तलाव, विहिरी आणि नदीत निर्माल्य विसर्जित केले जात आहे. त्यामुळे पाणी दूषित होत आहे. दीड दिवसाच्या गणपती विसर्जनानंतर निर्माल्य विसर्जनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे विसर्जनस्थळी निर्माल्य कुंडांची गरज व्यक्त होत आहे.
शहरासह ग्रामीण भागात गुरुवारी दीड दिवसाच्या गणरायाला निरोप देण्यात आला. दरम्यान गणेशभक्तांनी गणेशमूर्तीबरोबर निर्माल्यदेखील पाण्यातच विसर्जित केले. त्यामुळे काही पर्यावरणप्रेमींतून नाराजीचा सूर उमटला आहे. याबरोबरच काहींनी सजावटीचे व इतर साहित्यदेखील पाण्यात टाकल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे जलप्रदूषण आणि विसर्जनस्थळी कचऱयाची समस्या गंभीर बनली आहे.
शहरात 380 हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. त्याचबरोबर ग्रामीण भागातही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या अधिक आहे. घरगुती गणेशमूर्तींची संख्याही लक्षणीय आहे. दरम्यान गणेशोत्सव काळात सार्वजनिक गणेशोत्सवाबरोबर घरगुती गणरायासमोर पूजाअर्चा आणि इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कार्यक्रमांनंतर पूजेचे साहित्य पाण्यात सोडले जात आहे. त्यासाठी मनपा प्रशासनाने आणि ग्राम पंचायतींनी विसर्जनस्थळी निर्माल्य कुंड उभारावेत, अशी मागणी गणेशभक्तांतून जोर धरत आहे.