अस्तित्वातील स्वच्छतागृहांची दुरावस्था,दुर्गंधीचा सामना, काही ठिकाणी स्वच्छतागृहे बंद
कोल्हापूर प्रतिनिधी
सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी स्वच्छ व सुरक्षित स्वच्छतागृहे हा त्यांचा मुलभूत अधिकार आहेच. तसेच त्यांची ती महत्वाची गरजही आहे. सण-उत्सव काळात महिला मोठय़ा संख्येने शहरात येत असतात. त्या तुलनेत त्यांच्यासाठी पुरेशी स्वच्छतागृह नाहीत. तर अस्तित्वात असणाऱया स्वच्छतागृहांची प्रचंड दुरावस्था झाली असुन दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. स्वच्छतागृहांचा अभाव व त्यांची झालेली दुरावस्था यामुळे महिलांची कोंडी होत आहे. त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासकांनी याकडे गांभिर्याने लक्ष देऊन ही सुविधा प्राधान्याने देणे आवश्यक आहे.
सध्या गणेशोत्सवाची धामधुम आहे. त्यानंतर नवरात्रौत्सव, दिवाळी, दसरा आहे. या काळात मोठी गर्दी होते. जिल्हय़ासह परराज्यातील लाखो भाविक येथे येतात. गणेशोत्सवात देखावे पाहण्यासाठी, नवरात्रीत देवीच्या दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत गर्दी उसळलेली असते. कोल्हापुरात दैनंदिन हजारो पर्यटक, भाविक असतात. त्यातही महिलांची संख्या लक्षणीय असते. हे चित्र पाहता महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह अत्यल्प आहेत. त्यातही काहींची नियमित स्वच्छताच होत नसल्याने ती असून नसल्यासारखी आहेत. परिणामी, महिलांच्या आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम होत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. यामध्ये प्रामुख्याने किडनी स्टोन व मुत्राशय संसर्गाच्या धोक्याची शक्यता आहे.
महिला पोलिसांची कुचंबणा
डय़ुटीच्या ठिकाणी स्वच्छतागृहे नसतील तर महिला पोलिसांना मोठय़ा समस्यांना सामोरे जावे लागते. सध्याच्या काळात 600 पोलीस, 300 होमगार्ड अशा महिला कर्मचारी बंदोबस्तावर आहेत. गणेशोत्सव, नवरात्रोत्सवात शहरात विविध ठिकाणी बंदोबस्तासाठी त्यांची नियुक्ती असतेच, पण बऱयाच ठिकाणी स्वच्छतागृहांअभावी त्यांची कुचंबना होते. स्वच्छतागृहाअभावी त्या मानसिक तणावाखाली रहात आहेत.
मोबाईल टॉयलेटची संख्या वाढवण्याबरोबरच स्वच्छतेचीही गरज
नवरात्रोत्सवात येथे राज्यासह परराज्यातूनही भाविक येतात. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय असते. गर्दीच्या ठिकाणी स्वच्छतागृहे अपुरी पडत आहेत. तर जी स्वच्छतागृहे अस्तित्वात आहेत त्यांची नियमित स्वच्छता करणे गरजेचे आहे. बऱयाच ठिकाणी प्रचंड दुर्गंधीमुळे त्यांचा वापर करणे अवघड होत आहे. दसरा चौकातील स्वच्छतागृह तर गेल्या अनेक दिवसापासुन बंद अवस्थेत आहे. प्रशासनाने आतापासूनच मोबाईल टॉयलेटची संख्या वाढवणे आवश्यक बनले आहे.
या परिसरात आहेत महिला स्वच्छतागृह
कोल्हापूर बसस्थानक, रेल्वे स्टेशन, रंकाळा डी मार्ट व पदपथ उद्यान, रंकाळा स्टँड, अंबाबाई मंदिर विद्यापीठ परिसर, मेन राजाराम हायस्कूल, कसबा बावडा पॅव्हेलियन, राजारामपुरी जगदाळे हॉल, बिंदू चौक पार्किंग, शाहू स्टेडियम रोड येथे महापालिकेची महिला स्वच्छतागृहे आहेत. सध्या शहरातील रंकाळा, दसरा चौक, बिंदू चौक पार्किंग, पंचगंगा घाट, कोल्हापूर बसस्थानकाबाहेर, कावळानाका फायर स्टेशनसह गर्दीच्या 10 ठिकाणी ती प्रस्तावित आहेत.
संस्थांनी पुढाकार घेणे आवश्यक
दरम्यान, सध्याच्या स्वच्छतागृहांची स्थिती, प्रस्तावित स्वच्छतागृहांसाठी लागणारा वेळ पाहता महापालिका प्रशासनाने निदान उत्सवकाळात ती तात्पुरत्या महिला स्वच्छतागृहांची संख्या वाढवणे गरजेचे बनले आहे. त्यासाठी स्वयंसेवी संस्थांनीही पुढाकार घेणे गरजेचे आहे. मंडळांनी यात पुढाकार घेऊन अशी तात्पुरते स्वच्छतागृहे उभारल्यास देखावे पाहण्यासाठी येणाऱया महिलांची गैरसोय दूर होणार आहे. कदाचित हा पॅर्टर्न राज्यभर जाण्यास उपयुक्त ठरू शकतो.