वार्ताहर /सांबरा
बेळगाव-सांबरा रस्त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने रस्त्याच्या दुतर्फा झाडे-झुडपे वाढली आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. तरी संबंधित खात्याने रस्त्याच्या देखभालीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी वाहनचालकातून होत आहे.
सांबरा येथे विमानतळ व वायुदलाचे प्रशिक्षण केंद्र असल्याने बेळगाव-सांबरा रस्ता महत्त्वाचा म्हणून ओळखला जातो. या रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. दरवषी या रस्त्याच्या देखभालीसाठी लाखो रुपये खर्ची घालण्यात येतात. मात्र त्या मानाने रस्त्याची देखभाल करण्यात येत नाही. परिणामी रस्त्याच्या दुतर्फा अनेक ठिकाणी झाडे-झुडपे व गवत वाढले आहे. तर काही ठिकाणी लहान-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांची गैरसोय होत आहे. येथील विमानतळामुळे या रस्त्यावरून परगावच्या लोकांचेही येणे-जाणे असते. मात्र रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडे-झुडपांमुळे त्यांना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे.
मारुतीनगरजवळ रस्त्यावर सांडपाणी
बेळगाव-सांबरा रस्त्यावरील मारुतीनगरमध्ये न्यू गांधीनगर व अमननगर परिसरातील सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरल्याने वाहनचालकांना दररोज दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. गेल्या वर्षभरापासून सदर सांडपाणी रस्त्यावरून वहात आहे. मात्र याकडे महानगरपालिका व संबंधित लोकप्रतिनिधीनी दुर्लक्ष केले आहे. सांडपाण्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्यही धोक्मयात आले आहे.