मनपा आयुक्त,साहाय्यक कार्यकारी अभियंत्यांचा बेजबाबदारपणा चव्हाटय़ावर
प्रतिनिधी /बेळगाव
तानाजी गल्ली नजीकच्या नाल्यावरील चेंबर उघडेच असल्याने या ठिकाणी वाहने अडकून पडण्याचे प्रकार सुरूच आहेत. घाईगडबडीने जाणारी वाहने अडकत असल्याने वाहनधारकांना फटका बसत आहे. याबाबत महापालिका आयुक्त आणि साहाय्यक कार्यकारी अभियंत्यांकडे तक्रार करण्यात आली होती. पण तक्रार करून तीन महिने झाले तरी अद्याप चेंबरवर झाकण घालण्यात आले नसल्याने मनपाच्या अधिकाऱयांचा बेजबाबदारपणा चक्हाटय़ावर आला आहे.
धारवाड रोड येथील उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आल्यानंतर स्थानिक समस्यांचे निवारण करणे आवश्यक होते. पण महापालिकेसह सर्वच विभागांनी कानाडोळा केल्याने येथील समस्या जैसे थे आहेत. धारवाड रोड रेल्वेफाटकावर उड्डाणपुलाची उभारणी झाल्यामुळे रस्त्यावरील अवजड वाहनांची रहदारी कमी झाली आहे. मात्र काही गॅरेज व अन्य व्यवसाय असल्याने वाहनांची वर्दळ असते. पण या ठिकाणी निर्माण झालेल्या समस्यांचा फटका वाहनधारक आणि व्यावसायिकांना बसत आहे. येथे समस्यांचे निवारण करण्याकडे महापालिकेच्या अधिकाऱयांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. नाल्यावरील उघडय़ा चेंबरवर झाकण घालण्याचीही तसदी मनपा प्रशासनाकडून घेतली जात नाही. वास्तविक पाहता या नाल्याची भिंत जीर्ण झाली असून, नव्याने बांधण्याची गरज आहे. रेल्वेमार्गाच्या पलीकडील भागातील नाल्याचे बांधकाम करण्यात येत आहे. तसेच रुपाली थिएटरपासून लेंडी नाल्यापर्यंत नाल्याचे बांधकाम करण्यात आले आहे. पण उड्डाणपुलाच्या शेजारी असलेल्या नाल्याचे बांधकाम करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. परिणामी याचा त्रास स्थानिक रहिवाशांना होत आहे.
नाल्यावरील चेंबर उघडे असल्याने वाहने अडकण्याचा प्रकार सुरूच असतो. यामध्ये वाहन अडकल्याने वाहनधारकांची दमछाक होत असून दुचाकी वाहने अडकल्यास अपघात होण्याची शक्मयता आहे. तसेच लहान चारचाकी वाहने अडकल्यास वाहनांचे नुकसान होत आहे. त्यामुळे चेंबरवर झाकण घालणे आवश्यक आहे. या परिसरात रेणुका मंदिर असल्याने भाविकांसह वाहनधारकांची गर्दी कायम असते. याठिकाणी वाहने अडकल्याने याबाबत महापालिकेच्या साहाय्यक कार्यकारी अभियंत्या मंजुश्री यांच्याकडे दि. 5 ते 13 मे दरम्यान दोनवेळा तक्रार करण्यात आली होती. तसेच वाहने अडकल्याबाबतची छायाचित्रे पाठविण्यात आली होती. तसेच महापालिका आयुक्त रुद्रेश घाळी यांच्याकडे दि. 18 ऑगस्ट रोजी तक्रार करण्यात आली होती. पण महापालिका आयुक्त आणि साहाय्यक कार्यकारी अभियंत्या मंजुश्री यांनी या समस्येकडे कानाडोळा केला आहे. तक्रार करून तीन महिने झाले तरी उघडय़ा चेंबरवर झाकण घालण्यात आले नसल्याने मनपा अधिकाऱयांचा बेजबाबदारपणा चव्हाटय़ावर आला आहे.