किनाऱयांवरुन गोळे हटविण्याची पर्यटन खात्याला सूचना
प्रतिनिधी /पणजी
गोव्यातील विविध समुद्रकिनाऱयांवर आढळलेल्या तेल गोळय़ांची राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था म्हणजे एनआयओ तपासणी करणार असून ते गोळे गोव्यातील समुद्रात कसे पोहोचले याचाही अभ्यास केला जाणार आहे. अशा तेलगोळे असलेल्या समुद्रात आंघोळ करणे हानिकारक ठरू शकते, असे एनआयओचे म्हणणे आहे. तपासणीचा अहवाल एनआयओतर्फे लवकरच सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
गोव्याच्या समुद्रकिनारी असे तेलगोळे अधूनमधून सापडत असतात. समुद्रातील पाणी प्रदूषण किंवा तेल प्रदूषणामुळे हे गोळे येऊ शकतात. समुद्रातून अनेक तेलवाहू जहाजे फिरत असतात. त्यांची तेलगळती झाल्यास असे गोळे तयार होतात, असे अनुमान एनआयओने काढले आहे.
तपासणीनंतरच उलगडा होणार
ते तेलगोळे कशामुळे आले ते आता सांगता येणार नाही. तपासणीनंतरच त्याचे कारण समोर येणार आहे. तोपर्यंत स्थानिक लोकांनी, पर्यटकांनी समुद्रात आंघोळ करणे टाळावे, अशी सूचना एनआयओतर्फे करण्यात आली आहे. त्या तेलगोळय़ांचे नमुने एनआयओने गेळा केले असून ते एनआयओच्या प्रयोगशाळेत नेण्यात आले आहेत. हे तेलगोळे पर्यटन खात्याने त्वरित काढून घ्यावेत आणि समुद्रकिनारी स्वच्छ करावेत, असेही एनआयओने म्हटले आहे.
समुद्रस्नानासाठी किनाऱयांवर गर्दी
सध्या खाऱया पाण्याची आंघोळ करण्यासाठी लोकांची समुद्रकिनाऱयावर गर्दी होत असून समुद्रस्नानाचा आनंद लुटला जात आहे. त्यांना या तेलगोळय़ांची कोणतीच माहिती नसल्याचे दिसून येत आहे. हे तेलगोळे सर्व किनाऱयावर आलेले नसून काही मोजक्याच ठिकाणी ते सापडले आहेत. असे तेलगोळे समुद्रातही तरंगत असल्याचे दिसून आले आहे.