निशंक फौडेशनच्या प्रा. डॉ. पवन सुधीर यांनी मांडले मत : छत्रपती शिवाजी महाराजांचे गारुड राष्ट्रीय महोत्सवावर
प्रतिनिधी, सातारा
निशंक फेंडेशनच्यावतीने येथील यशोदा शिक्षण संस्थेमध्ये राष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवावर छत्रपती शिवाजी महाराजांचे गारुड दिसून येत होते. या महोत्सवाच्या प्रमुख अतिथी राष्ट्रीय अध्यक्षा प्रा. डॉ. पवन सुधीर यांनी आजच्या शैक्षणिक धोरणात ग्रीन स्कूल ही संकल्पना अंमलात आणली गेली पाहिजे.
विद्यार्थ्यांना आनंददायी पर्यावरण पूरक शिक्षण दिले गेले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. नीसंक महोत्सवामध्ये दुसरा दिवस समापन महोत्सवामध्ये संजीवन विद्यालय पाचगणी ने महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम सादर केला.
राष्ट्रीय महोत्सवामध्ये प्रमुख आकर्षण ठरली ती रत्नागिरी जिह्यातील खेड तालुक्यातील कौस्तुभ सुतार यांनी तब्बल 10 तास श्रम घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांची काढलेली रांगोळी. ही रांगोळी पाहण्यासाठी व रांगोळी काढणाऱ्या कौस्तुभ समवेत अनेकांनी फोटो काढले. त्याचबरोबर कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवर प्रा. डॉ. पवन सुधीर यांच्या हस्ते फित कापून आणि दीप प्रज्वलन करुन करण्यात आली. यावेळी माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, निशंक सोसायटीचे सेक्रेटरी उमेश देशमुख, प्रेसिडेंट विक्रम अडसुळ, राजवीर कुमार, सुनील देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
सुरुवातीपासून साताऱ्यातील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा, भवानी मातेचा गोंधळ, आरती अशा सांस्कृतिक कार्यक्रमांनी सगळ्या महोत्सवावर छ. शिवाजी महाराजांचे गारुड तयार झाले होते. प्रमुख अतिथी असलेल्या प्रा. डॉ. पवन सुधीर यांनी पर्यावरणाचा समतोल राखला गेला पाहिजे असे सांगितले