प्रतिनिधी / खानापूर : महाराष्ट्र एकीकरण समितीने २०१६ साली घेतलेल्या मेळाव्यात प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप ठेवत कर्नाटक सरकारने नितीन बानगुडे पाटील यांच्यावर आरोपपत्र दाखल केले होते. त्यांना अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते.
दरम्यान जामीन मिळवण्यासाठी खानापूर न्यायालयात नितीन बानगुडे पाटील हजर झाले असता न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यांना 27 ऑक्टोबर ही तारीख देण्यात आली आहे.
यावेळी त्यांच्या समवेत बेळगाव जिल्हा शिवसेनाप्रमुख प्रकाश शिरोळकर खानापूर म. ए समितीचे प्रकाश चव्हाण, यशवंत बिरजे, मुरली पाटील, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, दत्ता, पाटील महेश टमसाळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.