राजापूर वार्ताहर
मुंबई- गोवा महामार्गाचे राजापूर तालुक्यातील काम परिपूर्ण झाल्याशिवाय टोलवसुली सुरू करण्यात येवू नये, तसेच तालुक्यातील सर्व वाहनांना टोलमाफी देण्यात यावी, अशी मागणी राजापूरवासीयांतून करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन बांधकाम विभागाला देण्यात आले आहे. दरम्यान महामार्गाचे काम पूर्ण झाल्याशिवाय टोल वसुली सुरू केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
राजापूर तालुका हद्दीतील मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. तरी अद्यापही वाकेड ते टाकेवाडी या दरम्यान काही ठिकाणी तसेच शहरामध्ये एसटी डेपो समोरील तसेच हातीवले येथील अंकीता हॉटेलपासून टोलनाक्यापर्यंतचे महामार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. तसेच अद्यापही काही ठिकाणी दिवाबत्ती, पवाशी निवारा शेड, संरक्षक भिंती, सर्व्हीस रोड, संरक्षक कठडे, दिशादर्शक फलक, वृक्षलागवड ही व अशी अनेक कामे पलंबित आहेत. याशिवाय चौपदरीकरण कामात नद्या, वहाळ, पायवाटा, शेती अशा ठिकाणी टाकलेली माती, भराव अद्यापही हटविण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकऱयांच्या शेतात ये-जा करण्याच्या वाटा बंद झालेल्या आहेत. काही शेतकऱयांना अद्याप संपादित झालेल्या जमिनीचा मोबदलाही मिळालेला नाही. असे असताना एका खासगी कंपनीला ठेका देवून टोल वसुली करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार दि.1 डिसेंबर पासून हातिवले येथील टोल नाक्यावर टोल वसुलीला सुरूवात होणार होती.
या पार्श्वभूमीवर राजापूर तालुक्यातील वाहन चालक-मालक, व्यापारी, आंबा-शेती व्यवसायीक व नागरीकांनी एकत्र येत टोल वसुलीला विरोध दर्शविला आहे. त्यामुळे गुरूवारपासून सुरू होणारी टोलवसुली थांबविण्यात आल्याचे वृत्त आहे. दरम्यान याबाबत राजापूरवासीयांनी एकत्र येत टोल वसुलीला सुरूवात करण्यापूर्वी कंपनीने पलंबित कामे पूर्ण करावीत, अशी मागणी केली आहे. तसेच राजापूर तालुक्यातील सर्व वाहनांना टोलमाफी देण्यात यावी. टोलनाक्यावर रूग्णवाहीका, केन सारख्या अत्यावश्यक सुविधा तैनात ठेवाव्यात. स्ट्रीट लाईट, पिकअपशेडची कामे तात्काळ पूर्ण करावीत व टोल नाक्यावर नोकरीमध्ये स्थानिकांना पाधान्य द्यावे, अशा मागण्या केल्या आहेत.
या सर्व मागण्या पूर्ण न झाल्यास व टोल वसुली सुरू झाल्यास समस्त राजापूरवासीयांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या निवेदनावर काँग्रेस तालुकाध्यक्ष सुभाष बाकाळकर, माजी नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संदिप मालपेकर, दिनानाथ कोळवणकर, सौरभ खडपे, रविंद्र नागरेकर, पंढरीनाथ आंबेरकर, कोंढेतड माजी सरपंच अरविंद लांजेकर, पा.मारूती कांबळे, सुनिल भणसारी, श्रीपाद सपे, कैलास कोठारकर, अजिम जैतापकर, रोहन गिरकर, उल्हास विचारे, अमोल बोळे, नितीश कुडाळी, जिलानी काझी, संतोष धुरत, संदीप राऊत, संजय भामत, अनिकेत डोंगळे, सुनिल पवार, रूपेश धालवलकर यांसह राजापूरातील वाहन चालक मालक, व्यापारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.