आमदार अंजलीताई निंबाळकर यांची ग्वाही
प्रतिनिधी/खानापूर
खानापूर तालुक्मयातील 135 गावाना 24 तास स्वच्छ पिण्याचे पाणी मिळणार असून, या योजनेसाठी 565 कोटी रुपये मंजूर झाले असल्याची माहिती आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी तरुण भारत प्रतिनिधीशी बोलताना दिली.
या योजनेसाठी निविदा काढण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. येत्या 18 महिन्यात योजनेचे काम पूर्ण करण्यात यावे असा आदेश शासनातर्फे देण्यात आला आहे. शासनदरबारी सतत पाठपुरावा तसेच तांत्रिक बाबीवर चर्चा करून पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी लागणारा निधी शासनाकडून मंजूर करून घेतला आहे. जांबोटी परिसरातील सर्व गावांना अशाच प्रकारची योजना मंजूर करण्या संदर्भात माझे प्रयत्न सुरू असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
आरोग्य केंद्रातही लवकरच सुधारणा
तालुक्मयातील एकही गाव स्वच्छ पिण्याच्या पाण्यावाचून वंचित ठेवणार नाही अशी ग्वाहीही आमदारांनी दिली आहे. हळुहळू तालुक्मयातील पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण या विषयीचे प्रश्न मी निकाली काढल्याशिवाय गप्प बसणार नाही.आरोग्य विषयक चांगल्या सोयी मिळण्याबाबत सुद्धा माझे प्रयत्न सुरू आहेत. एमसीएच हॉस्पिटल, जुने सरकारी हॉस्पिटलसुद्धा नवीन करून 100 खाटांची संख्या वाढविण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. वर्षभरात आरोग्यसेवेमध्येही सुधारणा करण्यात येणार आहे. तालुक्मयातील प्राथमिक आरोग्य केंद्रातही बदल करायचे आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.