भारतीय बौद्ध संस्कृतीचा उपासक असलेल्या जपानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जोरदार स्वागत झाले. संघर्षाऐवजी समन्वयाचा पुरस्कार करणाऱया भारतीयांना जपान जवळचा वाटण्याचे हे एक मोठे कारण आहे. रशियाने युपेनबरोबर सुरू केलेले युद्ध आणि आपला शेजारी चीनची कुरापतखोरी, तैवानशी युद्ध करण्याची खुमखुमी या पार्श्वभूमीवर ‘वैराने वैर संपणार नाही, उलट वैऱयालादेखील प्रेमाने जिंका’ असा बुद्धसंदेश भारताने नेहमीच दिला आहे. जपान हा भारताचा मित्र देश आहे. गेल्या काही वर्षांमध्ये या दोन्ही देशांतील संबंध अधिकाधिक सुधारत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 पासून देशाची सूत्रे सांभाळली आहेत. तेव्हापासून त्यांचा पाचवा जपान दौरा आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम प्रतिमा असलेल्या नरेंद्र मोदी यांनी आपल्या विविध देशांच्या दौऱयांमधून भारतीय संस्कृतीसह व्यापार आणि उद्योगाला चालना देण्याचे प्रयत्न केले आहेत. जपानमध्ये तरुणाई मोठय़ा प्रमाणावर घटत आहे. त्या देशापुढील ही समस्या अनेक संकटांना जन्म देत आहे. तथापि, जपानच्या सेवाक्षेत्रासह अन्य उद्योगांमध्ये भारतीय तरुणांची वाढती संख्या उल्लेखनीय आहे. जपानच्या आर्थिक उन्नतीसाठी ती उपकारक ठरत आहे. जपानमध्ये भारतीयांनी पंतप्रधान मोदींचे केलेले स्वागत त्याचेच द्योतक म्हणावे लागेल. तिथल्या भारतीयांनी जपानचे नागरिकत्व स्वीकारले असले तरी त्यांचे नियम पाळून त्यांच्या अंतरात्म्यात असलेल्या भारतीयत्वाला ते विसरले नाहीत. टोकियो विमानतळावर ‘जय श्रीराम’च्या घोषणा आणि मोदींच्या स्वागताचे फलक विलक्षण बोलके होते. ‘जो काशी को चमकाये हैं, वो टोकियो आये हैं, जो राम को लायें हैं, वो टोकियो आयें हैं,’ असा उल्लेख त्यावर होता. ते पुरेसे स्वयंस्पष्ट आहेत. पंतप्रधान मोदींशी झालेल्या संवादाच्या कार्यक्रमादरम्यान रित्सुकी कोबायाशी या छोटय़ा बालकाने चक्क हिंदीत संभाषण साधण्याचा प्रयत्न केला. भारतीयांशी वैचारिक आणि भावनिक जवळीकीचे हे दर्शन विलोभनीय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात स्वामी विवेकानंदांचा उल्लेख केला. जपानला भेट दिल्यानंतर स्वामीजी खूपच प्रभावित झाले होते. त्यांनी प्रत्येक भारतीयांनी किमान एकदा तरी जपानला भेट दिली पाहिजे, असे म्हटले होते. मोदी यांनी त्यात भर घालून प्रत्येक जपानी नागरिकाने भारताला भेट दिली पाहिजे, असे आवाहन केले. भारतीय स्वातंत्र्यलढय़ात सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या आझाद हिंद सेनेसाठी जपानची मदत लक्षणीय होती. किंबहुना अनेक जपानी सैनिक या सेनेत सामील झाल्याचा उल्लेख सापडतो. अशा ऐतिहासिक संबंधांमुळे येत्या काळात विकासाच्यादृष्टीने उभय देशांत होणाऱया वाटाघाटी फलद्रुप होणार यात संदेह नाही. हिंसाचार आणि अराजकाला दोन्ही देशांना वारंवार तोंड द्यावे लागले आहे. दहशतवादाविरुद्ध लढलेच पाहिजे मग तो देशांतर्गत असो किंवा आंतरराष्ट्रीय, त्याला तोंड दिलेच पाहिजे हे दोन्ही देशांनी ओळखले आहे, त्याला सामोरेही गेले आहेत. हिरोशिमा आणि नागासाकीवरील अणुबाँबचे शल्य जपान विसरलेला नाही. पण भारताप्रमाणेच सतत पुढे जात राहण्याची वृत्ती या देशाने जोपासली आहे. मुंबई ते अहमदाबाद बुलेट टेनसाठी जपानने मोठे सहकार्य केलेले आहे. ‘क्वाड’ देशांच्या या चर्चेचे फलित चांगले मिळेल, यात शंका नाही. ‘इंडो पॅसिफिक प्रेमवर्क फॉर प्रॉस्पेरिटी’ म्हणजेच भारतीय प्रशांतीय आर्थिक उन्नती कार्यक्रमात चर्चेसाठी बारा देशांचा सहभाग आहे. त्यात भारतासह अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, ब्रुनेई, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, मलेशिया, न्यूझिलंड, फिलिपाईन्स, थायलंड, व्हिएतनाम यांचा समावेश आहे. हिंदी-प्रशांत प्रदेश मुक्त आणि प्रत्येक देशाचे सार्वभौमत्व टिकवून ठेवणारा, आदर करणारा असला पाहिजे यावर सगळय़ा देशांचे एकमत झाले आहे. या आंतरराष्ट्रीय चर्चेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने चीनला दिलेला उघड आव्हानात्मक इशारा आणि त्याला चीनने दिलेले प्रत्युत्तर याकडे कानाडोळा करून चालणार नाही. चीनने तैवान हा आपल्या देशाचा भाग आहे असे सांगून त्यावर कब्जा करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी बळाचा वापरही होत आहे. तैवानवर चीनने हल्ला केल्यास आपण तैवानला मदत करू, त्यासाठी लष्करी कारवाई केली जाईल, असा इशारा अमेरिकेने दिला आहे. जो बायडेन यांचा हा इशारा म्हणजे उघड उघड युद्धाची खुमखुमी आहे. कारण, रशिया आणि युपेन यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धात उघडपणे युपेनची बाजू घेतलेल्या अमेरिकेने हे युद्ध थांबावे म्हणून काय केले, असा सवाल विचारला जाऊ शकतो. याउलट, अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे रशिया बिथरला आहे. त्याने आपल्या कारवाया अधिक तीव्र केल्या आहेत. जागतिक स्तरावरील युद्धसदृश परिस्थिती, चीनमध्ये अजून न थांबलेली कोविडची लाट, धान्यापासून जैव इंधन तयार करून त्यावर आपली वाहने चालवणारे श्रीमंत देश आणि दुसरीकडे उपासमारीमुळे मृत्युमुखी पडणारे गरीब देशातील नागरिक, मंकीपॉक्सच्या लाटेची जगभरातील शक्मयता अशा परस्परविरोधी परिस्थितीत शांतता व समन्वयाच्या माध्यमातून भारत प्रगतीची, विकासाची वाट शोधत आहे. तंत्रज्ञान, ऊर्जा, वित्त आणि संशोधन क्षेत्रात जपानने भारतात गुंतवणूक करावी, यासाठी तिथल्या सॉफ्टबँक कार्पोरेशनचे संस्थापक मासायोशी सॉन यांच्याशी पंतप्रधान मोदी यांनी चर्चा केली आहे. सुझुकीशी असलेले संबंध आणखी दृढ करण्याचा प्रयत्न केला आहे. कृषी, सेवाक्षेत्र आणि डिजिटल तंत्रज्ञानामध्ये भारत आपला पाया अधिकाधिक मजबूत करीत आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची पूर्तता व्हावी, हे मोदींचे धोरण आहे. कामगार सुरक्षा, पुरवठा साखळी, प्रदूषणरहित ऊर्जा यासाठी भारताने अमेरिकेबरोबर एक करार केला आहे. अन्य काही देशही या करारात सामील आहेत. यामुळे कोरोनानंतरच्या काळात जगभरातील वाणिज्य व्यवहार सुरळीत होऊन भरभराट होईल, अशी आशा व्यक्त करण्यास हरकत नसावी.
Trending
- कोल्हापुरात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची अतिविराट सभा : दोन लाखावर लोक जमतील
- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बेळगाव दौऱ्यात बदल
- दोन भावांचे मृतदेह सापडल्याने खळबळ
- सांकवाळ येथे 27 रोजी पंतप्रधानांची महासभा
- निवडणूक काळात आतापर्यंत 16 कोटींचा मुद्देमाल जप्त
- राष्ट्रप्रतिकांचा आम्ही नव्हे, भाजपच अवमान करतेय!
- विरियातो वसाहतवादी मानसिकतेचे सराईत दुतोंडे
- मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव