तरुण भारत वृत्ताची गांभीर्याने दखल : शनिवारी सकाळी तलावावर ग्रामपंचायती कडून प्रबोधन
कळंबा/प्रतिनिधी
कळंबा ग्रामपंचायतीने हौशी पोहणाऱ्यांवर बंदी घातली होती. मात्र, काही दिवसांनंतर बंदी आदेश झुगारून काहींचे पोहणे सुरूच आहे. आता याविरोधात पुन्हा ग्रामपंचायतीने आक्रमक धोरण स्वीकारले आहे. तसेच तरुण भारतच्या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष तलावावर जाऊन पोहणाऱ्यांना कडक शब्दात समज दिली. तसेच तलावात जनावरे, वाहने धुणे, कपडे धुणे, पोहणे तलापाणी प्रदुषणासाठी हे घटकही कारणीभूत ठरत असलेने पोहण्यास आल्यास फौजदारी गुन्हा दाखल करू, असा इशारा दिला.
शनिवारी सकाळी सात ते नऊ वाजे पर्यंत कळंबा तलावात जनावरे, वाहने धुणे, पोहणे कारणीभूत तलावामध्ये राजरोस जनावरे आणि वाहने धुणे, पोहण्याचे प्रकार सुरु आहेत. पाणी प्रदुषणासाठी हे घटकही कारणीभूत ठरत असल्याने ग्रामपंचायतीने प्रदुषण रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्ह्णून येथे काही पदाधिकाऱ्यांनी कडक शब्दांत समज देऊन पोहण्यास सकळी पोहायला येणाऱ्या वर मज्जाव केला. तलावाचे पाणी शहरासह कळंबा आणि अधून मधून पाचगाव ग्रामस्थ पिण्यासाठी वापरत असल्याने पुन्हा पोहायला येण्याचा प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाई करू, असा इशारा यावेळी देण्यात आला.
तसेच आसपासच्या लोक वस्तीतून नागरिक गाडी, जनावरे . कळंबा तलाव जवळ असल्याने येथे दररोज दीडशे ते दोनशे लोक पोहायला येतात. तलावातील पाणी कळंबा व पाचगावचे ग्रामस्थ पिण्यासाठी वापरत असतानाही याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले होते. मात्र, ही संख्या वाढत गेल्याने ग्रामपंचायतीने काही वर्षापूर्वी पोहण्यावर बंदी घातली होती. दोन-तीन महिने कडक अंमलबजावणीनंतर कळंब्यातील काही व्यक्तींच्या मदतीने पुन्हा पोहायला सुरुवात केली होती.
पोहणाऱ्यांविरोधात ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. याचदरम्यान शनिवारी सकाळी पदाधिकाऱ्यांकडून तलावाला भेट दिली यावेळी प्रतिबंध करताना सरपंच सागर भोगम ग्रामधीकरी दिलीप तेलवी ग्रामपंचायत सदस्य उदय जाधव ग्रामपंचायत कर्मचारी व पोलीस प्रशासन उपस्तीत होते.