Not a single village in Maharashtra will allow even a single heel to go to Karnataka
महाराष्ट्रातील एकही गाव टाचणी भरही कर्नाटकात जाऊ देणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीत जाणार नाहीत .कन्नड आणि मराठी सीमा प्रश्न हा मुद्दा असला. तरी महाराष्ट्रातील 40 ही गावे महाराष्ट्रातच राहणार असे भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना सावंतवाडीत स्पष्ट केले योग गुरु रामदेव बाबा यांनी महिलांबाबत जे विधान केलं ते अयोग्य आहे. त्याचं कोणीही समर्थन करणार नाही. आणि कोणी करूही नाही महिलांबाबत असा विधान करणे शोभनीय नाही .असेही त्यांनी स्पष्ट केले. सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असलेले बावनकुळे सावंतवाडी त आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सीमेलगतची चाळीसगाव कर्नाटक मध्ये घेणार हे विधान केलं. ते चुकीचा आहे. कुठल्याही परिस्थितीत टाचणीभरही जागा कर्नाटकात जाणार नाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होऊ देणार नाहीत असे ते म्हणाले चाळीसही गावे महाराष्ट्रातच राहणार. असे त्यांनी ठणकावून सांगितले.
सावंतवाडी / प्रतिनिधी