पावसाळा सुरु होताच कृष्णाकाठाला महापुराची धास्ती : अधिकाऱयांमध्ये समन्वयाची आवश्यकता : पूररेषेतील अतिक्रमण हटविणे गरजेचे
प्रतिनिधी /अथणी
पावसाळा सुरू झाला की कृष्णाकाठावर असलेल्या नागरिकांमध्ये महापुराची धडकी भरते. महापुरामुळे अथणी तालुक्मयातील 28 गावे जलमय होतात. यातून कोटय़वधी रुपयांचे नुकसान होते. याला अतिवृष्टी जबाबदार असली तरी कर्नाटक व महाराष्ट्रातील अधिकाऱयांमध्ये नसलेला समन्वय तितकाच कारणीभूत आहे. पावसाळा सुरू होताच फक्त बैठकांचे नियोजन होत असते. त्यावर कायमस्वरुपी तोडगा काढणे आवश्यक आहे. 2005, 2006, 2009, 2019, 2021 मध्ये आलेल्या महापुरामुळे मोठय़ा प्रमाणात हानी होताना जनजीवन विस्कळीत झाले होते. याचा धडा घेत योग्य तो समन्वय राखण्याबरोबरच तातडीने उपाययोजना हाती घेणे गरजेचे आहे.
कृष्णाकाठ पूरस्थितीला वाढलेला पाऊस कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. जादा पाऊस झाल्याने महाराष्ट्रातील जलाशयांतून पाणी सोडले जाते. याचवेळी आलमट्टीतून विसर्ग कमी झाल्यास कृष्णा नदीला फुगवटा तयार होऊन पुराचा अनेक गावांना वेढा बसतो. महाराष्ट्रातील जलाशयातून सोडण्यात येणार पाणी, नद्यांवर उभारण्यात आलेले बंधारे, पुलाच्या दोन्ही बाजूला घालण्यात आलेल भराव आणि नदीकाठावरील अतिक्रमणही कारणीभूत आहे. दोन्ही राज्यातील अधिकाऱयांशी संपर्क साधून योग्य समन्वय साधल्यास किमान नुकसान होऊ शकते. किंवा महापूर टाळला जाऊ शकतो.
महाराष्ट्र सरकारकडून आलमट्टी धरणाला जबाबदार धरले जाते. तर कोयना व इतर धरणांतून पाणी जादा सोडल्याने पूर येत असल्याचे कर्नाकटकडून सांगितले जाते. त्यामुळे या विसंवादात नदी भागातील लोकांचे प्रत्येक पावसाळय़ात हाल मात्र नक्की होतात. कर्नाटक पाणीपुरवठा खात्याच्या अभियंत्यांना महाराष्ट्रातून किती पाणी सोडण्यात येत आहे, याची माहिती नसते. महाराष्ट्र व कर्नाटक पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱयांच्या बैठका होत असल्या तरी अद्याप त्याचा सकारात्मक परिणाम दिसत नसल्याने या बैठकाही केवळ फार्सच ठरत असल्याचे चित्र आहे.
अधिकाऱयांचे दुर्लक्ष
महाराष्ट्रातून नद्यांमध्ये येणारे पाणी याची नोंद करण्यासाठी प्रत्येक 10 ते 15 किलोमीटरवर पाणी मापन केंदे आहे. नदीतून व धरणातून किती पाणी वाहत आहे, किती पाण्याची आवक तसेच जावक सुरू आहे. याची नोंद या केंद्रात होत असते. तरीही याचा परिणाम सकारात्मक होताना दिसत नाही. अवैज्ञानिक पद्धतीने उभारण्यात आलेल्या बंधाऱयांमुळे पाण्याचा फुगवडा होताना पुराची दाहकता वाढते. याचाही अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी विचार करुन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे समस्या निकाली निघालेली नाही.
सर्वपक्षीय नेत्यांनी आवाज उठवावा
प्रत्येकवेळी महाराष्ट्राकडे बोट करून हात झटकण्याने सदर समस्या निकाली निघणार नाही. महाराष्ट्र शासनाशी याबाबत बोलून सर्वपक्षीय नेत्यांनी आवाज उठविल्यास ही समस्या सोडविली जाऊ शकते. पण त्यासाठी लोकप्रतिनिधींची इच्छाशक्ती दिसत नसल्याचा संताप नागरिकांतून व्यक्त होत आहे. केवळ पावसाळय़ात पूर आल्यावर बैठका आणि समन्वयाचा आव आणण्यापेक्षा यावर कायमचा तोडगा काढावा. पाऊस, जलाशयातून होणारा विसर्ग, नदीकाठावरील अतिक्रमणे, अवैज्ञानिक पद्धतीने उभारण्यात आलेले बंधारे, पूररेषेतील अडचणी सोडविताना कायमस्वरुपी उपाययोजना हाती घेणे गरजेचे आहे.