शेतकर्यांना मोठा दिलासा : काम करावे लागणार बंद
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव येथील दिवाणी न्यायालयाने स्थगिती देऊनही हलगा मच्छे-बायपासचे काम सुरू ठेवण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.त्या न्यायालयानेही रस्त्याचे काम करण्यासाठी स्थगिती दिली आहे. जोपर्यंत बेळगाव येथील दिवाणी न्यायालयातील खटल्याचा निकाल लागत नाही. तोपर्यंत स्थगिती कायम ठेवली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या वतीने ॲड. रविकुमार गोकाककर यांनी काम पाहिले.