प्रतिनिधी/ सातारा
इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी सातारा जिह्यात शांततेत पार पडली. पाचवीसाठी 142 केंद्रावर तर आठवीसाठी 103 केंद्रावर परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते. इयत्ता पाचवीसाठी पेपर 1 ला 19 विद्यार्थ्यांनी पेपर 2 ला 18 हजार 998 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर इयत्ता आठवीची पेपर 1 ला 13 हजार 604 विद्यार्थ्यांनी तर पेपर 2 ला 13 हजार 608 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षा केंद्रांना प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांच्यासह अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या. आपल्या पाल्यांना सोडण्यासाठी पालक परिक्षाह केंद्रावर आले होते.
इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीची शिष्यवृत्तीची परीक्षा रविवारी पार पडली. सातारा तालुक्यात पाचवीसाठी 21 केंद्रावर 3456 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. इयत्ता आठवीसाठी 17 केंद्रावर 2609 विद्यार्थी बसले होते. जावली तालुक्यात 10 केंद्रावर 631 विद्यार्थ्यांची नोंदणी होती. इयत्ता आठवीसाठी 6 केंद्रावर 551 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. महाबळेश्वर तालुक्यात इयत्ता पाचवीसाठी 7 परीक्षा केंद्रावर 715 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. इयत्ता आठवीसाठी पाच केंद्रावर 623 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. वाई तालुक्यात इयत्ता पाचवीसाठी 11 केंद्रावर 1382 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. इयत्ता आठवीसाठी सहा केंद्रावर 936 विद्यार्थ्यांची नोंदणी केली होती. खंडाळा तालुक्यातील इयत्ता पाचवीसाठी 8 केंद्रावर 936 विद्यार्थी नोंदणी केलेले होते. इयत्ता आठवीसाठी तीन केंद्रावर 618 विद्यार्थी नोंदणी केली होती. फलटण तालुक्यात इयत्ता पाचवीसाठी 24 केंद्रावर 1862 विद्यार्थ्यांची नोंदणी होती. इयत्ता आठवीसाठी 14 केंद्रावर 1054 विद्यार्थ्यांची नोंदणी केली होती. माण तालुक्यात इयत्ता पाचवीसाठी 9 केंद्रावर 1440 विद्यार्थी नोंदणीकृत होते. इयत्ता आठवीसाठी 8 केंद्रावर 1150 विद्यार्थी बसले होते.