गुलाम नबी आझाद एकदाचे काँग्रेस सोडून गेले. गेली वर्ष-दीड वर्षे ते पक्षामध्ये फार अस्वस्थ होते. त्यांना राज्यसभा मिळाली नव्हती. ती आज ना उद्या मिळेल या आशेवर गेल्या वषीच्या फेब्रुवारी-मार्चपासून ते डोळे लावून बसले होते. सोनिया गांधी सरतेशेवटी आपल्या बाजूने उभ्या राहतील आणि महाराष्ट्र, कर्नाटक अथवा राजस्थान वा हरयाणातून आपल्याला परत संसदेत आणतील या वेडय़ा आशेवर ते होते. पण राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनी आझाद यांना वाटाण्याच्या अक्षता लावायच्या हे ठरवलेलेच होते. त्यामुळे गेली जवळजवळ पन्नास वर्षे कोणत्या ना कोणत्या पदावर राहिलेल्या गुलाम नबी यांनी काँग्रेसपासून आझाद होणे शेवटी ठरवले. मात्र त्याने पक्षातील कोणाला आश्चर्य वाटले नाही.
इंदिरा गांधींच्या काळापासून काँग्रेसच्या प्रथम परिवाराच्या जवळ असणारे आझाद हे एक नंबरचे संधीसाधू आहेत अशी सामान्य कार्यकर्त्याची कधीच भावना झाली होती. राज्य सभेतील विरोधी पक्षनेते म्हणून आझाद यांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे भावपूर्ण भाषण केले त्याने काँग्रेसी अजिबात द्रवले नव्हते उलट आझादसाहेबानी सत्ताधाऱयांशी किती घट्ट गट्टी केली आहे याने ते उडाले होते. गेल्या वषी आझाद यांना पद्मविभूषण सन्मान मिळाल्यामुळे हा संशय पक्काच झाला.
याचा अर्थ आझाद यांच्या राम राम ठोकल्याने काँग्रेसला नुकसान होणार नाही का? या प्रश्नाचे उत्तर ‘होय’ आणि ‘नाही’ असे दोन्ही आहे. ‘होय’ याकरता की पक्षातून जे÷ नेते सोडून चालले की ‘काँग्रेसचे आता कसे होणार?’ अशी चिंता हितचिंतकांना वाटते तर पक्षाला लागलेल्या गळतीचा जोरदार प्रचार-प्रसार विरोधक करतात. काँग्रेस म्हणजे ‘डुबणारी नौका’ आहे असा डंका पिटायला कधीची सुरुवात झाली आहे. हे वातावरण असेच कायम ठेवण्यासाठी प्रयत्न होणार. आनंद शर्मा यांच्यासारखे बिनबुडाचे नेते या संधीचा फायदा घेऊन पक्ष सोडून जाऊ शकतात. शर्मा हे दोनदा भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांना भेटले आहेत. शर्मा देखील राज्यसभेकरता व्याकुळ आहेत. काँग्रेसमध्ये असे बरेच ‘आनंद शर्मा’ आहेत. पक्षात नॉमिनेशन संस्कृती सुरु झाल्याने अशाच लोकांची मौज झाली. पक्षाला आता दुर्दैवाचे दशावतार झेलावे लागत असताना देखील या लोकांची पदाची हाव सुटत नाही आहे.
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून काँग्रेसवर अस्तित्वाचेच संकट आलेले आहे. अशावेळी सर्वांशी मिळूनमिसळून, संवाद करून मार्ग काढायच्या ऐवजी राहुल आणि प्रियंका आपलीच मनमानी करू लागल्याने पक्षातील जे÷ नेते सोडून चालले आहेत असा पक्षातील एक मतप्रवाह आहे. मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी राजकारणात जी पकड घेतली आहे आणि भाजपचा झेंडा बुलंद केला आहे तो परिश्रामातून तसेच प्रभावी रणनीतीतून. भाजप ध्रुवीकरणाचे घाणेरडे राजकारण करत आहे असे आरोप करून चालणार नाही. काँग्रेसला परत आपले नाणे खणखणीत करायचे असेल तर भाजपला कशी जोरदार टक्कर देता येईल हे बघितले पाहिजे. ते सोडून पक्षातील मंडळी एकमेकाचा काटा काढण्याच्या कामी लागले आहेत.
आझाद यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देऊन गांधी घराण्यालाच फक्त धक्का दिलेला नाही तर त्यांनी काँग्रेसमधील असंतुष्टाना देखील अचानक वाऱयावर सोडले आहे. काँग्रेसमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या ग्रुप ऑफ 23 (जी-23) चे आझाद म्होरके होते. त्यांनी स्वतःच्या भल्याकरता या असंतुष्ट गटाला देखील तोंडघशी पाडले आहे. ‘तुम्हाला पक्षात सुधारणा घडवून आणण्याकरता आम्ही नेतृत्व दिले होते, बंडाळी करण्याकरता नव्हे’, अशी जळजळीत प्रतिक्रिया या गटाचे एक सदस्य संदीप दीक्षित यांनी दिली आहे ती बोलकी
आहे.
त्यामुळे आझाद यांच्या काँग्रेस सोडण्याची बातमी दोन दिवस चालेल आणि मग सारे काही शांत होईल. याला कारण आझाद हे कधी नेते नव्हतेच. इंदिरा गांधींपासून काँग्रेसच्या नेतृत्वाचा त्यांच्यावर वरदहस्त राहिल्याने ते स्वतःला नेते म्हणवत होते. ते थोर नेते असते तर महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी एकदापण आले नसते. काश्मिरी माणूस जात्याच चतुर असतो असे म्हणतात. आझाद यांनी पक्षात आपले असे जबरदस्त नेटवर्किंग केले की त्यामुळे ते फार थोर आहेत अशी हवा निर्माण झाली. आपल्या हितशत्रूंना आझाद यांनी इतक्मया सफाईने काटले की भल्याभल्यांची वाट लागली.
आझाद आणि भाजपचे गुळपीठ जमू लागले आहे याची कुणकुण गेले वर्षभर ऐकू येत होती. मोदी अचानकपणे आझाद यांना वेंकय्या नायडू निवृत्त झाल्यावर उपराष्ट्रपती बनवतील अशी चर्चा बरेच दिवस राजकीय वर्तुळात होती. एकीकडे काँग्रेसचे कांडात काढायचे आणि दुसरीकडे राज्यसभेत पाहुण्यांकडून साप मारायचा असा हा दुहेरी डाव आहे असे बोलले जात होते. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात.
नवीन परिस्थितीत आझाद यांचा वापर जम्मू आणि काश्मीरमध्ये भाजप करेल असे बोलले जाते. आझाद लवकरच एखादा प्रादेशिक पक्ष काढून भाजप धार्जिणे राजकारण सुरु करतील. वादग्रस्त 370 कलम रद्द केल्यापासून जम्मू आणि काश्मीरचा राज्याचा दर्जा गेला आहे आणि तो केंद्र शासित प्रदेश झाला आहे. भाजपकडे मुख्यमंत्रीपदाचा चेहेरा नसल्याने आझाद यांना पुढे करून काश्मीर खोऱयात जम बसवण्याचे राजकारण सत्ताधारी करू शकतात. त्याला कितपत यश येईल हे काळच दाखवेल. आझाद काँग्रेसमध्ये राहिले असते तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहराच राहिले असते. कारण पंधरा वर्षांपूर्वी मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या पक्षाबरोबर काँग्रेसने युती केल्यावर जवळजवळ तीन वर्षे आझाद मुख्यमंत्री राहिले होते. पुढील सहा-आठ महिन्यात तेथील निवडणूक होऊ शकते.
कोणताही नेता पक्ष सोडून गेला तर त्या पक्षाला नुकसान होतेच. कारण एखाद्याला नेता बनवण्याकरता पक्षाला दोन-तीन दशके लागतात. असे असले तरी काही नेतेमंडळी पक्षात राहूनच संघटनेला सुरुंग लावण्याचे काम करतात हे देखील तेव्हढेच खरे. काँग्रेस मुक्त भारताची मोहीम सुरु झाल्यापासून अशी नेतेमंडळी आतून कामाला लागली आहेत. आनंद शर्मा आणि आझाद यांच्यासारखे नेते पक्ष सोडून गेले तर राहुलना हवेच आहे. त्यांना ही जुनी धेंडे नको आहेत. ती जेव्हढय़ा लवकर जातील तेव्हढे चांगले असेच राहुलना वाटते. आपण आपल्या नव्या दमाच्या सहकाऱयांबरोबर पक्ष परत उभा करू असा राहुल यांना विश्वास आहे. तो कितपत योग्य अथवा अनाठायी हे येणारा काळच दाखवेल. येत्या पंधरवडय़ात काँग्रेस ‘भारत जोडो’ यात्रा सुरु करत आहे. अशावेळी पक्षाला अपशकुन करण्याचे काम आझाद यांनी केले आहे. आजारी असलेल्या सोनिया गांधी या उपचारासाठी परदेशी गेल्या असताना आझाद यांनी पक्षाला सोडचिट्टी देऊन ‘सूर्याजी पिसाळाचे’ काम केले आहे असा आरोप नि÷ावंत करत आहेत.
लढवय्ये असलेले अमरिंदरसिंग पंजाबचे मुख्यमंत्रीपद गेल्यावर काँग्रेस सोडून बाहेर गेले आणि अक्षरशः गायब झाले. काँग्रेसची पंजाबमधील सत्ताही गेली हेही तेवढेच खरे. आझाद काँग्रेसपासून आझाद झाल्यावर ते किती बहादुरी करणार हे लवकरच दिसणार आहे.
गुलाम नबी आझाद एकदाचे काँग्रेस सोडून गेले. गेली वर्ष-दीड वर्षे ते पक्षामध्ये फार अस्वस्थ होते. त्यांना राज्यसभा मिळाली नव्हती. ती आज ना उद्या मिळेल या आशेवर गेल्या वषीच्या फेब्रुवारी-मार्चपासून ते डोळे लावून बसले होते. सोनिया गांधी सरतेशेवटी आपल्या बाजूने उभ्या राहतील आणि महाराष्ट्र, कर्नाटक अथवा राजस्थान वा हरयाणातून आपल्याला परत संसदेत आणतील या वेडय़ा आशेवर ते होते. पण राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनी आझाद यांना वाटाण्याच्या अक्षता लावायच्या हे ठरवलेलेच होते. त्यामुळे गेली जवळजवळ पन्नास वर्षे कोणत्या ना कोणत्या पदावर राहिलेल्या गुलाम नबी यांनी काँग्रेसपासून आझाद होणे शेवटी ठरवले. मात्र त्याने पक्षातील कोणाला आश्चर्य वाटले नाही.
इंदिरा गांधींच्या काळापासून काँग्रेसच्या प्रथम परिवाराच्या जवळ असणारे आझाद हे एक नंबरचे संधीसाधू आहेत अशी सामान्य कार्यकर्त्याची कधीच भावना झाली होती. राज्य सभेतील विरोधी पक्षनेते म्हणून आझाद यांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे भावपूर्ण भाषण केले त्याने काँग्रेसी अजिबात द्रवले नव्हते उलट आझादसाहेबानी सत्ताधाऱयांशी किती घट्ट गट्टी केली आहे याने ते उडाले होते. गेल्या वषी आझाद यांना पद्मविभूषण सन्मान मिळाल्यामुळे हा संशय पक्काच झाला.
याचा अर्थ आझाद यांच्या राम राम ठोकल्याने काँग्रेसला नुकसान होणार नाही का? या प्रश्नाचे उत्तर ‘होय’ आणि ‘नाही’ असे दोन्ही आहे. ‘होय’ याकरता की पक्षातून जे÷ नेते सोडून चालले की ‘काँग्रेसचे आता कसे होणार?’ अशी चिंता हितचिंतकांना वाटते तर पक्षाला लागलेल्या गळतीचा जोरदार प्रचार-प्रसार विरोधक करतात. काँग्रेस म्हणजे ‘डुबणारी नौका’ आहे असा डंका पिटायला कधीची सुरुवात झाली आहे. हे वातावरण असेच कायम ठेवण्यासाठी प्रयत्न होणार. आनंद शर्मा यांच्यासारखे बिनबुडाचे नेते या संधीचा फायदा घेऊन पक्ष सोडून जाऊ शकतात. शर्मा हे दोनदा भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांना भेटले आहेत. शर्मा देखील राज्यसभेकरता व्याकुळ आहेत. काँग्रेसमध्ये असे बरेच ‘आनंद शर्मा’ आहेत. पक्षात नॉमिनेशन संस्कृती सुरु झाल्याने अशाच लोकांची मौज झाली. पक्षाला आता दुर्दैवाचे दशावतार झेलावे लागत असताना देखील या लोकांची पदाची हाव सुटत नाही आहे.
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून काँग्रेसवर अस्तित्वाचेच संकट आलेले आहे. अशावेळी सर्वांशी मिळूनमिसळून, संवाद करून मार्ग काढायच्या ऐवजी राहुल आणि प्रियंका आपलीच मनमानी करू लागल्याने पक्षातील जे÷ नेते सोडून चालले आहेत असा पक्षातील एक मतप्रवाह आहे. मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी राजकारणात जी पकड घेतली आहे आणि भाजपचा झेंडा बुलंद केला आहे तो परिश्रामातून तसेच प्रभावी रणनीतीतून. भाजप ध्रुवीकरणाचे घाणेरडे राजकारण करत आहे असे आरोप करून चालणार नाही. काँग्रेसला परत आपले नाणे खणखणीत करायचे असेल तर भाजपला कशी जोरदार टक्कर देता येईल हे बघितले पाहिजे. ते सोडून पक्षातील मंडळी एकमेकाचा काटा काढण्याच्या कामी लागले आहेत.
आझाद यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देऊन गांधी घराण्यालाच फक्त धक्का दिलेला नाही तर त्यांनी काँग्रेसमधील असंतुष्टाना देखील अचानक वाऱयावर सोडले आहे. काँग्रेसमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या ग्रुप ऑफ 23 (जी-23) चे आझाद म्होरके होते. त्यांनी स्वतःच्या भल्याकरता या असंतुष्ट गटाला देखील तोंडघशी पाडले आहे. ‘तुम्हाला पक्षात सुधारणा घडवून आणण्याकरता आम्ही नेतृत्व दिले होते, बंडाळी करण्याकरता नव्हे’, अशी जळजळीत प्रतिक्रिया या गटाचे एक सदस्य संदीप दीक्षित यांनी दिली आहे ती बोलकी
आहे.
त्यामुळे आझाद यांच्या काँग्रेस सोडण्याची बातमी दोन दिवस चालेल आणि मग सारे काही शांत होईल. याला कारण आझाद हे कधी नेते नव्हतेच. इंदिरा गांधींपासून काँग्रेसच्या नेतृत्वाचा त्यांच्यावर वरदहस्त राहिल्याने ते स्वतःला नेते म्हणवत होते. ते थोर नेते असते तर महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी एकदापण आले नसते. काश्मिरी माणूस जात्याच चतुर असतो असे म्हणतात. आझाद यांनी पक्षात आपले असे जबरदस्त नेटवर्किंग केले की त्यामुळे ते फार थोर आहेत अशी हवा निर्माण झाली. आपल्या हितशत्रूंना आझाद यांनी इतक्मया सफाईने काटले की भल्याभल्यांची वाट लागली.
आझाद आणि भाजपचे गुळपीठ जमू लागले आहे याची कुणकुण गेले वर्षभर ऐकू येत होती. मोदी अचानकपणे आझाद यांना वेंकय्या नायडू निवृत्त झाल्यावर उपराष्ट्रपती बनवतील अशी चर्चा बरेच दिवस राजकीय वर्तुळात होती. एकीकडे काँग्रेसचे कांडात काढायचे आणि दुसरीकडे राज्यसभेत पाहुण्यांकडून साप मारायचा असा हा दुहेरी डाव आहे असे बोलले जात होते. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात.
नवीन परिस्थितीत आझाद यांचा वापर जम्मू आणि काश्मीरमध्ये भाजप करेल असे बोलले जाते. आझाद लवकरच एखादा प्रादेशिक पक्ष काढून भाजप धार्जिणे राजकारण सुरु करतील. वादग्रस्त 370 कलम रद्द केल्यापासून जम्मू आणि काश्मीरचा राज्याचा दर्जा गेला आहे आणि तो केंद्र शासित प्रदेश झाला आहे. भाजपकडे मुख्यमंत्रीपदाचा चेहेरा नसल्याने आझाद यांना पुढे करून काश्मीर खोऱयात जम बसवण्याचे राजकारण सत्ताधारी करू शकतात. त्याला कितपत यश येईल हे काळच दाखवेल. आझाद काँग्रेसमध्ये राहिले असते तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहराच राहिले असते. कारण पंधरा वर्षांपूर्वी मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या पक्षाबरोबर काँग्रेसने युती केल्यावर जवळजवळ तीन वर्षे आझाद मुख्यमंत्री राहिले होते. पुढील सहा-आठ महिन्यात तेथील निवडणूक होऊ शकते.
कोणताही नेता पक्ष सोडून गेला तर त्या पक्षाला नुकसान होतेच. कारण एखाद्याला नेता बनवण्याकरता पक्षाला दोन-तीन दशके लागतात. असे असले तरी काही नेतेमंडळी पक्षात राहूनच संघटनेला सुरुंग लावण्याचे काम करतात हे देखील तेव्हढेच खरे. काँग्रेस मुक्त भारताची मोहीम सुरु झाल्यापासून अशी नेतेमंडळी आतून कामाला लागली आहेत. आनंद शर्मा आणि आझाद यांच्यासारखे नेते पक्ष सोडून गेले तर राहुलना हवेच आहे. त्यांना ही जुनी धेंडे नको आहेत. ती जेव्हढय़ा लवकर जातील तेव्हढे चांगले असेच राहुलना वाटते. आपण आपल्या नव्या दमाच्या सहकाऱयांबरोबर पक्ष परत उभा करू असा राहुल यांना विश्वास आहे. तो कितपत योग्य अथवा अनाठायी हे येणारा काळच दाखवेल. येत्या पंधरवडय़ात काँग्रेस ‘भारत जोडो’ यात्रा सुरु करत आहे. अशावेळी पक्षाला अपशकुन करण्याचे काम आझाद यांनी केले आहे. आजारी असलेल्या सोनिया गांधी या उपचारासाठी परदेशी गेल्या असताना आझाद यांनी पक्षाला सोडचिट्टी देऊन ‘सूर्याजी पिसाळाचे’ काम केले आहे असा आरोप नि÷ावंत करत आहेत.
लढवय्ये असलेले अमरिंदरसिंग पंजाबचे मुख्यमंत्रीपद गेल्यावर काँग्रेस सोडून बाहेर गेले आणि अक्षरशः गायब झाले. काँग्रेसची पंजाबमधील सत्ताही गेली हेही तेवढेच खरे. आझाद काँग्रेसपासून आझाद झाल्यावर ते किती बहादुरी करणार हे लवकरच दिसणार आहे.
सुनील गाताडे