अॅपमध्ये येणार मेसेज : भारतीय शास्त्रज्ञांची मोठी कामगिरी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भूकंपामुळे अनेकदा मोठी जीवित व वित्तहानी होत असते. याचे सर्वात मोठे उदाहरण तुर्की आणि सीरियामध्ये अलीकडेच घडले असून या आपत्तीत 50 हजारांहून अधिक लोकांना प्राणास मुकावे लागते. आता भारतीय शास्त्रज्ञांनी भूकंपामुळे होणारी मोठी हानी टाळण्यासाठी भूकंपपूर्व इशारा प्रणाली विकसित केली आहे. आयआयटी रुरकीमधील संशोधकांनी विकसित केलेली ही प्रणाली भूकंपाच्या 45 सेकंद आधी अलर्ट जारी करत असल्यामुळे लोक सतर्क होत असल्याचा दावा केला जात आहे.
भूकंपपूर्व इशारा देणारी ही प्रगत प्रणाली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ऊरकीने विकसित केली आहे. ही यंत्रणा सिस्मिक सेन्सर तंत्रज्ञानावर आधारित आहे. या यंत्रणेने गेल्या चार महिन्यांत तीनवेळा यशस्वी इशारे दिले आहेत. विशेष म्हणजे ही प्रणाली भारतीय परिस्थितीनुसार देशातील शास्त्रज्ञांनी विकसित केली आहे. भूकंपप्रवण क्षेत्रात राहणाऱ्या उत्तराखंडमधील सामान्य लोकांसाठी ही यंत्रणा अत्यंत उपयुक्त ठरू शकते. या यंत्रणेमुळे लोक सावध होत असल्यामुळे अनेक बहुमूल्य जीव वाचू शकतात. आयआयटी ऊरकीने विकसित केलेल्या या प्रणालीमध्ये उत्तराखंड ते नेपाळ सीमेपर्यंत 170 सेन्सर बसवण्यात आले आहेत. या प्रणालीने गेल्यावषी नोव्हेंबरपासून तीनवेळा भूकंपाच्या 45 सेकंद आधी यशस्वी इशारा दिला आहे.
उत्तराखंडची परिस्थिती लक्षात घेऊन ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या भागात भूकंपाचे धक्के वारंवार जाणवत असतात. जास्त तीव्रतेचा भूकंप झाल्यास जीवित व वित्तहानी होण्याचा धोकाही मोठा असतो. अशा स्थितीत सेन्सर स्थापित केलेल्या ठिकाणांचा डेटा मध्यवर्ती सर्व्हरमध्ये रेकॉर्ड केला जातो. त्यानंतर ताबडतोब इशारा जारी केला जातो. सुऊवातीला सिस्मिक सेन्सरवरून भूकंपाचा डेटा रेकॉर्ड केला जातो. त्यानंतर त्याची माहिती डेटा सर्व्हरवर जाते, त्याचे विश्लेषण केल्यानंतर एक इशारा दिला जातो, अशी माहिती आयआयटी ऊरकीचे शास्त्रज्ञ डॉ. पंकज कुमार यांनी दिली. हे सर्व कार्य काही सेकंदांमध्ये पूर्ण होत असल्यामुळे लोक मोठ्या नैसर्गिक आपत्तीपासून वेळीच अलर्ट होऊ शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले. पहिल्या टप्प्यात ही यंत्रणात उत्तराखंड परिसराला मध्यवर्ती धरून विकसित करण्यात आली आहे. त्यानुसार आता ती मोबाईल अॅपशी जोडलेली आहे. हे अॅप उत्तराखंड प्रशासनाने सर्वसामान्यांसाठी बनवले असून त्या अॅपवरून लोकांना अलर्ट पाठवले जातात. हे अलर्ट लिखित संदेश किंवा व्हॉईस स्वऊपातही प्राप्त होऊ शकतात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही या सेन्सर प्रणालीचे कौतुक केले आहे.
8 नोव्हेंबर 2022 रोजी या प्रणालीने नेपाळमधील भूकंपाचा 5.8 रिश्टर स्केलचा पहिला इशारा जारी केला. डेहराडूनमध्ये 45 सेकंदांपूर्वी इशारा देण्यात आला होता. त्यानंतर 12 नोव्हेंबरला नेपाळमध्ये 5.4 रिश्टर स्केलचा आणखी एक भूकंप झाला. यासोबतच 24 जानेवारी 2023 रोजी डेहराडूनमध्ये राहणाऱ्या लोकांना अॅपच्या माध्यमातून 45 सेकंदांपूर्वी व्हॉईस मेसेज आणि नोटिफिकेशनद्वारे भारत-नेपाळ सीमेवर भूकंपाची सूचना देण्यात आली होती. अनेक संवेदनशील ठिकाणी यंत्रणा बसविण्याची प्रक्रिया सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.