मुंबई \ ऑनलाईन टीम
ओबीसी आरक्षणावर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न तात्कळ मार्गी लावण्यात यावा अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. राज्य सरकार ओबीसी आरक्षणावर तोडगा काढत आहे. ओबीसी आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी आणि विचारविनिमय करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व पक्षीय नेते उपस्थित होते मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे अनुपस्थि होते. सह्याद्री विश्रामगृहावर ही बैठक पार पडली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सर्वपक्षीय बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे घेण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांची या बैठकीला हजर होते. या बैठकीला मात्र राज ठाकरे अनुपस्थि होते.
ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर भाजपने आक्रमकता दाखवली होती. सर्वोच्च न्यालयाने ओबीसी आरक्षण रद्द केल्याचा निर्णय दिला आहे. या निर्णयाविरोधात कायदेविषयक बाबी आणि मार्ग काढण्याबाबत सविस्त चर्च करण्यात येईल. सर्वोच्च न्यायालयात महाविकास आघाडीने केलेली पुनर्विचार याचिकाही न्यायालयाने फेटाळली आहे. यामुळे ग्रामपंचायत, जिल्हापरिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण संपुष्टात आलं आहे.