सांगली, प्रतिनिधी
ओबीसी आरक्षणावरुन (OBC Reservation) गेल्या काही दिवसापासून राजकीय वातावरण चांगलचं तापल आहे. त्यातच येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत तरी ओबीसींना स्थान मिळणार आहे का असा प्रश्न उपस्थित करत नेत्यांनी आता महाविकास आघाडीवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. काल मंत्री छगन भुजबळ यांनी जनगणना करावी अशी मागणी केली. दरम्यान भाजप नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी याच मुद्यावरुन मविआवर टीकास्त्र सोडले. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ओबीसी आरक्षणासाठी संघर्ष अटळ असल्याचा इशाराही दिला.
हेही वाचा- Vat Pournima Special 2022 : जाणून घ्या, शुभ मुहूर्त आणि महत्त्व
मविआवर (Maha Vikas Aghadi) टीका करताना पडळकर म्हणाले, गेल्या अडीच वर्षापासून महाविकास आघाडी सरकार ओबीसींच्या राजकीय हक्कांना पायदळी तुडवण्याची एकही संधी सोडली नाही. इम्पीरिकल डेटा, राज्य सरकार की केंद्र सरकार असा वाद सुरु केल्याने ओबीसी आरक्षण मागे पडले. यांनी ओबीसींना फसवले आहे असा आरोपही त्यांनी केला.
हेही वाचा- राज ठाकरेंच्या अटक वॉरंटवर सुनावणी पूर्ण, शुक्रवारी होणार फैसला
ते बोलताना पुढे म्हणाले, सुरुवातीला आपलं अपयश झाकण्यासाठी सेन्सेस डेटा की इम्पीरिकल डेटा असा केंद्र सरकार व राज्य सरकार असा वाद निर्माण केला त्यात दीड वर्ष घालवले. वेळेवर आयोगाचं गठन न करणं, केले तरी त्याला हेतू परस्पर निधी देण्यास टाळाटाळ करणे या सर्व भानगडी मुळे ठाकरे सरकार सुप्रीम कोर्टात तोंडावर आपटले आहे. असेही ते म्हणाले.