प्रतिनिधी/ बेळगाव
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रिंगरोडसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. त्यानंतर सर्व शेतकऱयांनी त्याला तीव्र विरोध केला आहे. नोटिफिकेशन जारी केल्यानंतर एकवीस दिवसांमध्ये शेतकऱयांनी हरकती दाखल करायच्या होत्या. त्यामुळे शनिवारी मुतगा गावातील शेतकऱयांनी तालुका पंचायतचे माजी सदस्य सुनील अष्टेकर यांच्या नेतृत्वाखाली शिवबसवनगर येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात हरकती दाखल केल्या आहेत.
रिंगरोडसाठी मुतग्यासह 31 गावांतील शेतकऱयांच्या जमिनीबाबत नोटिफिकेशन प्रांताधिकारी रविंद्र करलिंगन्नावर यांनी दिले होते. त्यानुसार आता प्रत्येक गावातील शेतकरी आपल्या हरकती नोंदवत आहेत. मुतगा येथील ग्रामस्थांनी या हरकती दाखल केल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत आम्ही रिंगरोडला जमिनी देणार नाही, असा निर्धार केला आहे.
यावेळी भाऊ जाधव, सातेरी पाटील, अजित पुजारी, महेश पाटील, विठ्ठल मनोहर, बाबू केदार, नागाप्पा चौगुले, बाबू चौगुले यांच्यासह शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. हरकत दाखल करण्यासाठी 2 नोव्हेंबर ही अंतिम तारीख आहे. त्यामुळे आता उर्वरित शेतकरीही हरकती दाखल करणार आहेत.
संतिबस्तवाड-वाघवडे शेतकऱयांच्याही हरकती
रिंगरोडविरोधात संतिबस्तवाड आणि वाघवडे येथील शेतकऱयांनीही आपल्या हरकती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे नोंदविल्या आहेत. वाघवडे, संतिबस्तवाड या परिसरातील शेतकऱयांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहून हरकती दिल्या आहेत. ऍड. एम. जी. पाटील, ऍड. प्रसाद सडेकर यांच्या नेतृत्वाखाली या हरकती दिल्या गेल्या. यावेळी शावेर गोन्साल्वीस, महादेव बिर्जे, बाळाराम पाटील, हणमंत संजीमनी, यल्लाप्पा गुंजण्णावर, मारुती होनगेकर, निंगाप्पा मेलगे, बाळू नाईक तसेच वाघवडे येथील राजू दिवटगे, परशराम दिवटगे, सोमनाथ परिट, विठ्ठल आंबोळकर, महादेव आंबोळकर, कृष्णा यळेबैलकर, शिवाजी पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.