प्रतिनिधी /बेळगाव
शुक्रवारी पावसाच्या अधूनमधून सरी कोसळल्या. मात्र म्हणावा तसा जोर अजूनही नव्हता. या पावसामुळे काहिसा गारवा हवेमध्ये निर्माण झाला होता. शुक्रवारी पावसामुळे फेरीवाले, भाजीविपेते यांना काहिसा त्रास सहन करावा लागला. पावसाला जोर नसला तरी अधूनमधून सरी कोसळत होत्या. त्यामुळे साऱयांनाच रेनकोट, छत्री यांचा आधार घ्यावा लागला.
या पावसामुळे शिवारातील कामांना गती मिळाली आहे. मात्र अजून दमदार पावसाची गरज असून पाऊस झाल्यानंतरच बटाटा आणि भात लागवड करणे सोपे जाणार आहे. सध्या शेतकऱयांनी सोयाबिन, भुईमूग याचबरोबर भाताची पेरणी पूर्ण केली आहे. उगवण झालेल्या भातामध्ये कोळपणीच्या कामालाही शेतकऱयांनी सुरुवात केली आहे.
यावषी मान्सूनला म्हणावा तसा जोर नाही. त्यामुळे नदी-नाले कोरडे आहेत. याचबरोबर विहिरींचे पाणीही कमी झाले आहे. सध्या हवेमध्ये गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत मान्सूनचे दमदार आगमन होईल, अशी आशा शेतकऱयांतून व्यक्त होत आहे. या पावसामुळे काही ठिकाणी चिखलाचे साम्राज्य झाले होते. तर काही ठिकाणी दलदलही पसरली होती. त्यामधून वाहने चालविणे तसेच चालत जाणेदेखील कठीण झाले होते.