शेतीला मोठा दिलासा : अनेक ठिकाणी पाणी साचल्याने समस्या
प्रतिनिधी /बेळगाव
यावषी मान्सूनचे आगमन उशिराने झाले. केवळ ढगाळ वातावरण आणि पावसाचा शिडकावा होत होता. त्यामुळे मान्सून दडी मारणार की काय? अशी धाकधूक शेतकऱयांसह साऱयांनाच लागून होती. मात्र गेल्या तीन दिवसांपासून मान्सूनचे आगमन झाल्याने बळीराजासह साऱयांनाच दिलासा मिळाला आहे. मंगळवारी झालेल्या संततधार पावसानंतर बुधवारीही दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. या पावसामुळे शहरामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचून होते. यामुळे वाहनचालकांना तसेच पादचाऱयांना कसरत करावी लागत होती.
खरीप पिकाची पेरणी जवळपास पूर्ण झाली. त्यामुळे बळीराजाला पावसाची नितांत गरज होती. मात्र पावसाने बरेच दिवस हुलकावणी दिली होती. त्यानंतर आता पावसाला सुरुवात झाल्याने बळीराजा सुखावला आहे. भातलावणीसाठी शेतकऱयांना हा पाऊस फायद्याचा आहे. पावसामुळे काही भागातील नदी-नाले प्रवाहित झाले आहेत. जलाशयांमध्ये पाण्याचा साठा वाढू लागला आहे. त्यामुळे पाणीसमस्याही दूर होणार आहे.
बाजारपेठेतील व्यावसायिकांना त्रास
बुधवारी पावसामुळे शहरातील बाजारपेठेतील फेरीवाले, भाजीविपेते तसेच इतर व्यावसायिकांना त्रास सहन करावा लागला. पाऊस सुरू झाल्यामुळे बऱयाच जणांचा रेनकोट, छत्री खरेदी करण्याकडे ओढा वाढला होता.
शहराबरोबरच उपनगरांमधील सखल भागांमध्ये पाणी साचून होते. या पावसामुळे काही ठिकाणी मात्र दलदल पसरली होती. त्यामधून वाट काढताना साऱयांनाच त्रास सहन करावा लागत होता. दोन दिवसांपासून संततधार पावसामुळे गटारी तुडुंब भरून वाहत होत्या. अनेक ठिकाणी रस्त्यांवरून पाणी वाहत होते. काही ठिकाणी तर दुकानांमध्ये आणि घराच्या उंबऱयापर्यंत पाणी पोहोचले होते. बुधवारी सरी कोसळत असल्या तरी पाऊस उसंत घेत होता. त्यामुळे पाण्याचा निचरा होताना दिसत होता. सध्या स्मार्ट सिटीची कामे सुरू आहेत. त्या ठिकाणी मात्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. पावसामुळे हवेमध्ये काही प्रमाणात गारवा निर्माण झाला होता. सध्या तरी या पावसामुळे जनजीवन काहीसे विस्कळीत झाले तरी शेतकऱयांना मात्र या पावसाने तारले आहे.