वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हिमाचल प्रदेशातील ईएमटीए पॉवर लिमिटेडच्या तीन अधिकाऱयांना कोळसा घोटाळा प्रकरणी प्रत्येकी तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दिल्लीतील कनि÷ न्यायालयाने गुरुवारी हा निर्णय दिला. हा घोटाळा 2009 मध्ये उघडकीस आला होता. त्यानंतर तब्बल 13 वर्षांनी त्याचा कनि÷ न्यायालयात निर्णय लागला आहे. शिक्षा झालेल्या अधिकाऱयांमध्ये उज्जलकुमार उपाध्याय आणि बिकाश मुखर्जी या संचालकांचा समावेश आहे. त्यांच्यावर गुन्हेगारी, कटकारस्थान आणि फसवणूक हे आरोप सिद्ध झालेले आहेत. या अधिकाऱयांनी कंपनीसाठी बनावट माहिती देऊन कोळसा खाणींचे अधिकार मिळविण्याचा आरोप आहे.
त्यांच्यावर प्रत्येकी 20 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. निर्णयाविरोधात अपील करण्यासाठी त्यांना 45 दिवसांचा अवधी देण्यात आला असून या काळात शिक्षेची अंमलबजावणी न करण्याचा आदेश देण्यात आला आहे. कोळसा खाणींसाठी केलेल्या अर्जात कंपनीचे उत्पादन आणि मालमत्ता याविषयी दिशाभूल करणारी माहिती त्यांनी नमूद केली होती. हा अर्ज 16 ऑगस्ट 2007 मध्ये सादर करण्यात आला होता. 13 सप्टेंबर 2007 ला त्यांच्या अर्जाची छाननी होऊन त्यांना कोळसा खाणी देण्यात आल्या होत्या. तथापि, नंतर त्यांनी बनावट माहितीच्या आधारे कोळसा खाण मिळविल्याचे दिसून आले होते.