वृत्तसंस्था/ पुडुचेरी
चेन्नईजवळील महाबलिपुरम येथे 28 जुलै ते 10 ऑगस्ट दरम्यान होणाऱया 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेची क्रीडाज्योत रॅली रविवारी पुडुचेरीत दाखल झाली.
ऑलिम्पिक स्पर्धेच्या धर्तीवर पहिल्यांदाच बुद्धिबळ ऑलिम्पियाड क्रीडाज्योत रॅली आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे पहिल्यांदाच भारताला यजमानपद लाभले असून बुद्धिबळ ऑलिम्पियाड क्रीडा ज्योत रॅलीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. या क्रीडा ज्योतीचा प्रवास 40 दिवसांचा असून या कालावधीत ती ज्योत 75 शहरांना भेट देत आहे. रविवारी पुडुचेरीचे मानद लेफ्ट. गव्हर्नर डॉ. टी. सौंदर्यराजन यांनी येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत ऑलिम्पियाड क्रीडा ज्योत ग्रँडमास्टर आकाश गणेशकडून स्वीकारली. गेल्या शुक्रवारी ही क्रीडाज्योत थिरुवनंतपुरममध्ये दाखल झाली होती. या स्पर्धेमध्ये जगातील 200 देशांचे स्पर्धक सहभागी होत आहेत.