नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी आता नेत्यांमधील भेटीगाठीचे सत्र सुरू झाले आहे. सुभासपचे प्रमुख ओमप्रकाश राजभर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान उत्तरप्रदेश आणि बिहारमधील राजकीय स्थिती, लोकसभा निवडणुकीच्या तयारीसमवेत राजभर समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली असल्याचे राजभर यांनी सांगितले आहे. उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान समाजवादी पक्षासोबत सुभासपने आघाडी केली होती. परंतु निवडणुकीत भाजप पुन्हा विजयी झाल्यावर सुभासपने पुन्हा रालोआत परतण्याचा निर्णय घेतला आहे. अशा स्थितीत ओमप्रकाश राजभर यांना राज्यात मंत्रिपद हवे आहे, परंतु योगी आदित्यनाथ सरकारमध्ये अद्याप मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज असल्याचे मानले जात आहे.
Previous Article3 हजार फुटांवर आहे हा खडक
Next Article विसरभोळ्या लोकांचे गाव
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.