प्रतिनिधी /बेळगाव
अखिल भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या बेळगाव शाखेची बैठक सोमवार दि. 25 रोजी सह्याद्री पथसंस्थेच्या सभागृहात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा चिटणीस विलास घाडी होते.
3 ऑगस्ट रोजी पक्षाचा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. यंदा अमृतमहोत्सवी वर्धापनदिन असून त्यानिमित्त ज्ये÷ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. यानिमित्त निंगोजी हुद्दार, नारायण जाधव, जी. एस. पाटील, एस. आर. पाटील, दिनकर सडेकर, यल्लाप्पा बांडगी, गोविंद जाधव, डी. एल. आंबेवाडीकर, विठ्ठल पाटील, म्हात्रू झंगरुचे या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
बैठकीत मनोज पावशे, ऍड. राजाभाऊ पाटील, शिवाजी सुंठकर, कृष्णा हुंदरे, गोपाळ काटकर, रामचंद्र मोदगेकर यांनी विचार व्यक्त केले. बैठकीला एस. एल. चौगुले, नानू पाटील, पुंडलिक पाटील, नारायण खांडेकर, कृष्णा बसरीकट्टी, रावजी पाटील, प्रकाश अष्टेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.