राज्यातील स्थिती ः 13 जणांचा रेबिजने मृत्यू
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावसह संपूर्ण राज्यात भटक्मया कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मागील वर्षी 2021-22 मार्चअखेर राज्यातील 1.5 लाख नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची नोंद आरोग्य विभागाकडे करण्यात आली आहे. त्याचबरोबर 2 हजार 677 नागरिकांना मांजर व माकड यासारख्या प्राण्यांनी चावा घेतल्याची नोंद आहे.
त्या आधी म्हणजे 2020-21 च्या मार्चअखेर एकूण 2.5 लाख नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला होता. मागील वर्षभरात कुत्रा तसेच इतर प्राणी चावल्याने 13 जणांचा रेबिजने मृत्यू झाला होता. कुत्रा चावल्यानंतर प्रथमतः प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार घेतात. प्राथमिक आरोग्य केंद्राकडून रोजच्या रोज माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडे पाठविली जाते.
खासगी रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱया रुग्णांची यामध्ये नोंद करण्यात आलेली नाही. खासगी रुग्णालयांकडून या संबंधीची माहिती वेळच्या वेळी उपलब्ध होत नसल्यामुळे यापेक्षाही अधिक आकडेवारी असू शकते. भटकी कुत्री व त्यांच्यापासून होणारे धोके लक्षात घेऊन राज्य सरकारने यावर कायमची उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.