२८ लाखाच्या मुद्देमालासह एकाला केली अटक, महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी /मिरज
मिरजेत बिबट्याची कातडी, सांबरांची शिंगे आणि खवल्या मांजराच्या खवल्यांची तस्करी करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली आहे. बिबट्याची कातडी, सांबरांची 2 शिंगे आणि खवल्या मांजराची 18 किलो खवले असा 28 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तस्करी करणार्या एकाला महात्मा गांधी चौक पोलिसांनी अटक केली आहे. संरक्षित वन्य प्राण्यांचे अवयव बाळगणे, विक्री करण्याचा प्रयत्न करणे या प्रकरणी अशोक सदाशिव कदम (वय 55 रा. कदमवाडी, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सबंधित संशयीताकडून पूर्ण वाढीच्या एक लाखाचे बिबट्याचे चमडे, पन्नास हजार किमतीची दोन सांबरांची शिंगे आणि अत्यंत दुर्मिळ समजल्या जात असलेल्या खवल्या मांजराची दहा लाखाचे 18 किलो खवले जप्त केली आहेत.