ऑनलाईन टिम / नवी दिल्ली
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्थानिक भाषांना नव्हे, तर इंग्रजीला पर्यायी भाषा म्हणून हिंदीचा स्वीकार केला पाहिजे, अशी टिप्पणी केल्यानंतर वादाला तोंड फुटले असतानाच, ‘वन नेशन वन लँग्वेज’साठी हीच योग्य वेळ आहे.’ असे भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्षांनी विरोधी पक्षांवर टीका करताना म्हटले आहे.
7 एप्रिल रोजी संसदीय राजभाषा समितीच्या 37 व्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शाह म्हणाले होते, “हिंदी ही इंग्रजीला पर्यायी भाषा म्हणून स्वीकारली पाहिजे, स्थानिक भाषांना नाही.” यानंतर केरळचे माजी खासदार आणि भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ए. पी. अब्दुल्लाकुट्टी यांनी माध्यमांना सांगितले की, केंद्र सरकारच्या पाठपुराव्याने देशातील संवादाच्या दृष्टीने ‘एक राष्ट्र, एक कर’ सारख्या योजनेवर ‘एक राष्ट्र, एक भाषा’ ही संकल्पना राबवली जाऊ शकते.
अब्दुल्लाकुट्टी यांनी दावा केला की, हिंदी सिनेमा, सोशल मीडिया आणि नवीन तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे तामिळनाडू आणि केरळमधील नवीन पिढीतील बहुतांश लोक चांगले हिंदी बोलत आहेत. “माझ्या कुटुंबातही, तरुण पिढी माझ्यापेक्षा चांगली हिंदी बोलत आहे. हा नवा ट्रेंड आहे आणि मला वैयक्तिकरित्या वाटते की हीच योग्य वेळ आहे. केंद्र सरकारच्या पाठपुराव्याने आपण संवादासाठी ‘एक राष्ट्र एक भाषा’ सारख्या मार्गावर जाऊ शकतो.