कोल्हापूर प्रतिनिधी:
प्रतिकूल परिस्थिती कांद्याचे प्रचंड उत्पादन होऊन सुध्दा बळीराजा यावेळी संकटात सापडला आहे. दर वर्षी मे महिन्यात उच्चांकी दराने विकला जाणारा कांदा शेतकऱ्याला रडवताना दिसत आहे. पावसाने लवकर हजेरी लावल्यामुळे सद्या कांदा बाजारात कवडीमोल झाला आहे.
मागच्या महिन्यात ३० रुपये दर मिळणाऱ्या कांद्याचा भाव आज १ ते २ रुपये झाला आहे. मागणीपेक्षा उत्पादन जास्त झाल्यामुळे कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात खाली आले आहेत. त्यातच पाकिस्तान मधून आलेल्या कांद्यामुळे हे भाव आणखी घसरले आहेत. श्रीलंका सारख्या देशाकडून ३० रुपये दर मिळत असला तरी शेतकरी खर्च निघणार नाही या कारणास्तव कांदा पाठवायला तयार नसल्याचे चित्र आहे.
अवकाळी आलेला पावसामुळे या संकटात आणखी वाढ झाली आहे. १ ते २ रुपये भाव मार्केट ला मिळत असल्याचा कारणामुळे लिलाव बंद आहेत आणि पावसामुळे ठेवणीची अडचण अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. सध्या तरी पावसाने उसंत घेतली असल्यामुळे कांदा उत्पादकांवर आलेले हे संकट थोडे फार कमी होण्याची शक्यता आहे.