Tarun Bharat

देशाची 40 टक्केपेक्षा अधिकची संपत्ती 1 टक्का श्रीमंतांकडे

ऑक्सफॅमच्या अहवालामधून गरीब-श्रीमंतांची दरी स्पष्ट

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतातील सर्वात श्रीमंत असणाऱया 1 टक्का लोकांकडे देशाच्या एकूण संपत्तीपैकी 40 टक्केपेक्षा जास्त संपत्ती आहे, अशी माहिती ऑक्सफॅमने नुकत्याच जारी केलेल्या ‘सर्व्हायव्हल ऑफ द रिचेस्टः द इंडिया स्टोरी’ या अहवालात दिली आहे. अहवालात असेही म्हटले आहे की देशाच्या पहिल्या म्हणजे 50 टक्के लोकसंख्येकडे भारताच्या एकूण संपत्तीपैकी फक्त 3 टक्के संपत्ती आहे.

भारतातील 10 सर्वात श्रीमंत लोकांवर 5टक्के कर लावल्यास 1.37 लाख कोटी रुपये जमा होऊ शकतात. 2020-2023 साठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय (86,200 कोटी रु.) आणि आयुष मंत्रालयाच्या (3,050 कोटी रु.) अंदाजित निधीपेक्षा हे प्रमाण 1.5 पट जास्त आहे. एवढय़ा पैशातून देशातील सर्व मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पूर्ण पैसे मिळू शकतात.

2टक्के कर कुपोषितांच्या गरजा पूर्ण करेल

ऑक्सफॅमने म्हटले आहे की, ‘जर भारतातील अब्जाधीशांवर त्यांच्या एकूण संपत्तीवर 2 टक्के दराने कर लावला गेला तर पुढील तीन वर्षांसाठी कुपोषितांना अन्न देण्यासाठी देशाची 40,423 कोटी रुपयांची गरज भागवू शकेल.’

ऑक्सफॅमने सांगितले की, महामारी सुरू झाल्यापासून नोव्हेंबर 2022 पर्यंत भारतातील अब्जाधीशांच्या संपत्तीत दररोज 3,608 कोटी रुपयांची 121टक्के वाढ झाली आहे. दुसरीकडे, 2021-22 मध्ये एकूण वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) सुमारे 64 टक्के रक्कम 14.83 लाख कोटी रुपये आली. त्याच वेळी, टॉप-10 मध्ये केवळ 3टक्के जीएसटी आढळला.

2022 मध्ये अब्जाधीशांची एकूण संख्या 166

ऑक्सफॅमने म्हटले आहे की भारतातील एकूण अब्जाधीशांची संख्या 2020 मधील 102 वरून 2022 मध्ये 166 पर्यंत वाढली आहे. भारतातील 100 सर्वात श्रीमंत लोकांची एकत्रित संपत्ती 660 अब्ज डॉलर्स (54.12 लाख कोटी रुपये) वर पोहोचली आहे. ही रक्कम 18 महिन्यांहून अधिक काळ संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्पासाठी निधी देऊ शकते.

पुरुषांच्या तुलनेत महिला कामगारांना कमी वेतन

लैंगिक असमानतेवरील अहवालात असे म्हटले आहे की पुरुष वर्करने कमावलेल्या प्रत्येक 1 रुपयामागे महिला कामगारांना फक्त 63 पैसे मिळतात. अनुसूचित जाती आणि ग्रामीण कामगारांसाठी हे अंतर अधिक आहे. समाजातील पुढील वर्गाच्या तुलनेत, अनुसूचित जातीचे उत्पन्न केवळ 55 टक्के आहे, तर ग्रामीण कामगारांचे उत्पन्न 50टक्के आहे.

देशातील गरीब जास्त कर का भरतात?

‘देशातील गरीब लोक जास्त कर का भरतात? ते श्रीमंतांपेक्षा जीवनावश्यक वस्तू आणि सेवांवर जास्त खर्च करत आहेत. श्रीमंतांवर कर लावण्याची वेळ आली आहे.’

अमिताभ बेहर, ऑक्सफॅम इंडियाचे सीईओ

Related Stories

भारतीय शेअर बाजार 2700 अंकांनी कोसळला

Amit Kulkarni

युवा उद्योजक कंपनीत टाटाची गुंतवणूक

Patil_p

संगीताध्यायींची संगीत संमेलनांकडे पाठ का?

Amit Kulkarni

ओबेरॉय समूहाने ईईएसएलसोबत केला करार

Patil_p

एअरटेलची नवी वेगवान इंटरनेट सेवा

Patil_p

बिहारइतकीच मध्य प्रदेशातील पोटनिवडणूकही महत्त्वाची

Omkar B
error: Content is protected !!