साडेतीन महिन्यांत 56 आत्महत्या : घटना रोखण्यासाठी समुपदेशन गरजेचे : कोरोनोत्तर काळात गुन्हेगारीचा आलेख चढताच
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव शहर व तालुक्मयात खुनांचे सत्र व आत्महत्यांची मालिका सुरूच आहे. बेळगावकरांना अस्वस्थ करणाऱया या घटना आहेत. नवीन वर्षाच्या साडेतीन महिन्यांत 56 जणांनी आत्महत्या केल्याची माहिती हाती आली आहे. नागरी समाजाला धक्का बसावा अशाच या घटना आहेत.
बडाल अंकलगी येथे कर्जाला कंटाळून राजू मुकुंदगोळ (वय 42) या गवंडी कामगाराची आत्महत्या, रामतीर्थनगर येथे वडिलांच्या निधनाच्या धक्क्मयाने भूमिका सुभाष नाईक (वय 21) या तरुणीची आत्महत्या, कौटुंबिक कलहातून कोनवाळ गल्ली येथील अभिषेक सुळगेकर (वय 31) या युवकाची आत्महत्या, शिवाजीनगर येथील प्रीती दत्ता आंबेवाडकर (वय 28) या विवाहितेची आत्महत्या, आर्थिक विवंचनेमुळे अशोकनगर येथील जया गुरु पुजारी (वय 75) या वृद्ध पान दुकानदाराची आत्महत्या अशा अप्रिय बातम्या गेल्या पंधरा दिवसांत वाचायला मिळाल्या.
हिंडलगा येथील संतोष पाटील (वय 35) या कंत्राटदाराने उडुपी येथील लॉजमध्ये आत्महत्या केली आहे. मंगळवार दि. 12 एप्रिल रोजी घडलेल्या या घटनेने कर्नाटकातील राजकारण ढवळून निघाले आहे. पंचायतराज व ग्रामीण विकासमंत्री के. एस. ईश्वरप्पा यांना या आत्महत्या प्रकरणानंतर राजीनामा द्यावा लागला. आता याप्रकरणी ईश्वरप्पा यांना अटक व्हावी, या मागणीसाठी काँग्रेसने आंदोलन सुरू केले आहे.
गेल्या एक-दीड महिन्यातील घटना लक्षात घेता विद्यार्थी-विद्यार्थिनी, तरुणाई, कामगार, गृहिणी, वृद्ध व रुग्ण आदींचे आत्महत्येचे प्रकार सुरूच आहेत. पोलीस दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार 1 जानेवारी ते 16 एप्रिलच्या रात्रीपर्यंत बेळगाव शहर व तालुक्मयात 56 जणांनी आत्महत्या केली आहे. प्रत्येक घटनेला कारणे वेगवेगळी आहेत.
कौटुंबिक वाद, पती-पत्नीतील भांडण, अनैतिक संबंध, परीक्षेतील अपयश, आर्थिक चणचण, अनारोग्य, प्रेमप्रकरणी विफलता, मानसिक ताणतणाव, कर्ज प्रकरण, व्यसनाधीनता आदींमुळे आत्महत्याप्रकरणे घडल्याच्या नोंदी आहेत. डॉक्टर, विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक, कंत्राटदार आदींनीही वेगवेगळय़ा पद्धतीने आत्महत्येचा मार्ग स्वीकारला आहे. ही प्रकरणे नित्याचीच झाली आहेत.
विष प्राशनाने 9 जणांनी संपविले जीवन
विष प्राशनाने 9 जणांनी आपले जीवन संपविले आहे तर विहीर आणि तलावात उडी टाकून 6, स्वतःला पेटवून घेऊन एकाने आत्महत्या केली आहे. गळफास घेऊन आत्महत्या करणाऱयांची संख्या अधिक आहे. गेल्या साडेतीन महिन्यात 40 जणांनी गळफास घेऊन जीवन संपविले आहे. शनिवारी शिवाजीनगर व अशोकनगर परिसरात आत्महत्येच्या दोन घटना घडल्या आहेत.
केवळ चार प्रकरणांचा तपास पूर्ण
56 पैकी केवळ चार प्रकरणांचा तपास पूर्ण झाला आहे. उर्वरित प्रकरणांचा तपास अद्याप सुरू असल्याची माहिती कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रविंद्र गडादी यांनी दिली. आत्महत्या करणाऱयांमध्ये विणकर, गवंडी व सेंट्रिंग कामगार, छोटे व्यावसायिक आदींची संख्या अधिक आहे. एखादा प्रकार घडला की आत्महत्या रोखण्यासाठी वेगवेगळय़ा संघटना व सरकारी यंत्रणांकडून जनजागृती केली जाते. त्यामुळे त्या काहीकाळ थांबतातही. आत्महत्या काही थांबेनात, अशी परिस्थिती आहे.
आत्महत्यांप्रमाणेच खुनांचे सत्रही थांबता थांबेना. काही खून प्रकरणांचा तपास रखडला आहे. वाढत्या खून आणि आत्महत्या प्रकरणांमुळे पोलीस यंत्रणाही हैराण झाली आहे. एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केल्यानंतर कोणत्या कारणासाठी त्याने आपले जीवन संपविले, याचा तपास केला जातो. त्या व्यक्तीने चिठ्ठी लिहून ठेवली आहे का? याची पडताळणी केली जाते. अनेकजण फेसबुक लाईव्हवर आपल्या समस्यांचे गाऱहाणे मांडून लाईव्ह सुरू असतानाच विष घेतल्याची उदाहरणेही आहेत. तर काही जणांनी आपल्या जवळच्या व्यक्तीला फोन करून आत्महत्येची कल्पना देऊन जीवन संपविले आहे.
साडेतीन महिन्यांत 56 आत्महत्याप्रकरणे ही केवळ नागरी पोलीस स्थानकात नोंद झालेल्या घटना आहेत. रेल्वेखाली आत्महत्या करणाऱयांची संख्याही काही कमी नाही. कोरोनोत्तर काळात निर्माण झालेल्या आरोग्य समस्या, आर्थिक अडचणी, मानसिक ताणतणाव आदींमुळे आत्महत्येचे प्रकार वाढू लागले आहेत, असे पोलीस अधिकाऱयांचे सांगणे आहे.
क्षणभराच्या मानसिक ताणतणावातून आत्महत्या
उपलब्ध आकडेवारी लक्षात घेता सरासरी दोन दिवसातून एक आत्महत्येचा प्रकार घडतो आहे. आपल्यानंतर आपले आई-वडील, पत्नी-मुलांचे काय होणार? याचा विचारही न करता क्षणभराच्या मानसिक ताणतणावातून आत्महत्येचे पाऊल उचलले जाते. आत्महत्या केलेली व्यक्ती जरी संपली तरी तिने ज्या समस्यांमुळे आत्महत्या केली त्या समस्या काही संपत नाहीत. उलट कुटुंबीयांच्या संकटात आणखीनच भर पडते. पोलीस आणि समाजातून होणाऱया प्रश्नांच्या सरबत्तीला त्यांना तोंड द्यावे लागते.
सकारात्मक दृष्टिकोन गरजेचा
याप्रकरणासंबंधी मानसोपचार तज्ञ डॉ. चंद्रशेखर टी. आर. म्हणतात, कोरोनोत्तर काळात आत्महत्या वाढल्या आहेत. कारण, तिसऱया लाटेनंतर आरोग्य समस्या प्रत्येकालाच भेडसावते आहे. आता आपले काय होणार? याची चिंता सतावते आहे. कोरोनामुळे अनेकांवर बेरोजगारीची कुऱहाड कोसळली. नोकऱया गेल्या. आर्थिक घडी विस्कटली. कुटुंबातील महत्त्वाच्या व्यक्तींना गमावल्याचे दुःख असतेच. अशा कारणांमुळे ताणतणाव वाढला आहे. या ताणतणावातूनच आत्महत्येचा मार्ग स्वीकारला जात आहे. यापूर्वी मानसिक तणावाची टक्केवारी 10 ते 12 इतकी होती. कोरोनाकाळात तिच्यात दुप्पट वाढ झाली असून आता ती 25 ते 30 टक्मक्मयांवर पोहोचली आहे. आत्महत्येचा विचार आला तर थोडा वेळ मन दुसरीकडे गुंतविण्याचा प्रयत्न करावा. नकारात्मकतेपेक्षा सकारात्मक विचार स्वीकारावा, असा सल्लाही ते देतात.