दिल्ली प्रतिनिधी:
एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसींनी सरकारवर कठोर शब्दात टीका केली आहे. ज्ञानवापी मस्जिद कायम अस्तित्वात राहील तसेच भारतातील विविध क्षेत्रात वाढलेल्या महागाईमुळे लोकांना जगणे मुशकील झाले असुन याला सर्वस्वी अकबर शाहजहाँ जबाबदार असल्याचे ओवेसी यांनी वक्तव्ये केले.
ज्ञानवापी च्या मुद्द्यावरून पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी महागाईचा मुद्दा जोडत सरकारला लक्ष्य केले. ओवेसी यांनी महागाईच्या मुद्द्यावरून सरकारची खिल्ली उडवताना.. ‘पेट्रोल के दाम बढणे के लिये औरंगजेब जिम्मेदार है ‘ तसेच ‘देश के हर एक मुसीबत के लिये मुघल जिम्मेदार है’ असे वक्तव्ये केले. ज्ञानवापी मस्जिद मध्ये सापडलेले शिवलिंग नसून फव्वारा असल्याचेही त्यांनी सांगितले.