कोल्हापूर प्रतिनिधी :
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाचे प्रमुख ओवेसी म्हणाले की भारत देश ओवेसींचा नाही आणि मोदींचाही नाही, भारत जर कोणाचा असेल तर तो आदिवासी आणि द्रविड लोकांचा आहे. जे लोक भारतामध्ये आशिया आणि आफ्रिका खंडातून आले होते आणि त्यांच्या पासूनच हा देश बनला आहे.
महाराष्ट्रातील भिवंडी येथे एका रॅलीमध्ये बोलताना त्यांनी बीजेपी सरकारवर जोरदार हल्ला चढवला ओवेसी म्हणाले की..आज देशामध्ये बेरोजगारी महागाई यावर कोणीही चर्चा करत नाही. मुसलमान लोकांना बीजेपीची भीती दाखवली जात आहे. हा देश उद्धव ठाकरे यांचा नाही, ओवेसींचा नाही किंवा मोदी आणि शहा यांचाही नाही.
भारत जर कोणाचा देश असेल तर तो द्रविड आणि आदिवासी लोकांचा आहे. आफ्रिका, इराण, मध्य आशिया, पूर्व आशिया या चार ठिकाणांहून लोक आले होते. पण येथील मूळ लोक हे आदिवासी आणि द्रविड आहेत की जे ४००० वर्षापूर्वी येथे आले आहेत.