वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
दहशतवादी यासीन मलिकला दिल्ली न्यायालयाकडून दोषी ठरविण्यात आल्यावर पाकिस्तान आता जगासमोर त्याला वाचविण्यासाठी विनवणी करत आहे. पाक पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ट्विट करत यासीनसाठी आवाहन देखील केले आहे.
जम्मू-काश्मीरच्या राजकीय कैद्यांना भारताकडून मिळत असलेल्या वागणुकीकडे जगाने लक्ष द्यावे. यासीन मलिकला दहशतवादाच्या आरोपांमध्ये दोषी ठरविणे हा मानवाधिकारांच्या उल्लंघनांचा आरोप करणारा आवाज गप्प करण्याचा निरर्थक प्रयत्न आहे. मोदी सरकारला याकरता दोषी ठरविण्यात यावे असे शरीफ यांनी ट्विट करत म्हटले आहे.
यासीन मलिकला मागील आठवडय़ात टेरर फंडिंगप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेआहे. मलिकने स्वतःच्या गुन्हय़ांची कबुली न्यायालयासमोर दिली होती. याप्रकरणी 25 मे रोजी त्याला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. मलिकला कमीत कमी 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते.