मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पाहणीनंतर दिला आदेश
पणजी : ‘स्मार्ट सिटी’च्या कामांमुळे पणजीतील रस्त्यांचे उद्भवलेले प्रŽ सोडवण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल मंगळवारी रात्री पणजीतील रस्त्यांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी ‘रस्त्यांचे हे काम आता पावसाळ्यात बंद न करता सप्टेंबरपर्यंत चालूच ठेवावे’, असा आदेश सर्व संबंधितांना दिला. पावसाळ्यापूर्वी जी कामे पूर्ण व्हायला पाहिजेत त्या व अन्य कामांचा एकंदरीत आढावा मुख्यमंत्र्यांनी काल मंगळवारी घेतला. मुसळधार पाऊस पडला तर पणजीची अवस्था काय होईल, अशी भीती सर्वत्र व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी स्मार्ट सिटीचे सीईओ संजित रॉड्रिग्ज यांच्याबरोबर रात्री उशिरा पणजीतील एकंदरीत रस्त्यांची व गटार योजनेचीदेखील पाहणी केली.
रस्त्यांचे काम बंद ठेवू नका
पाऊस पडल्यानंतर गटारांच्या संदर्भात कुठे प्रŽ निर्माण झालेला आहे, हे लक्षात येईल. रस्त्यांचे काम मात्र बंद ठेवू नका. मलनिस्सारणाच्या वाहिन्या घालण्याचे काम होईल तेवढ्या लवकर पूर्ण करा. तसेच गटार बांधणीचे कामही पाऊस सुरू होण्याअगोदर पूर्ण करा, असेही मुख्यमंत्र्यांनी बजावले आहे.
पणजीतील रस्ते काँक्रीटचे करणार
पणजीतील रस्ते व त्यांचे बांधकाम हे पूर्णत: काँक्रीटचे करायचे आहे. त्यामुळे पावसाळ्यातदेखील हे काम चालू ठेवले तरी चालेल. सर्व रस्त्यांचे काम हे सप्टेंबर अखेर किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी या पाहणीदरम्यान दिले आहेत.
काम पावसाळ्यातही करणे शक्य
यापूर्वी मे च्या अखेरपर्यंत पणजीतील रस्त्यांची सर्वकामे पूर्ण करा. जर पूर्ण झाली नसतील तर ती बंद करा, असे सांगितले होते. पण आता ही कामे पावसाळ्यातदेखील चालूच ठेवा, कारण आता केवळ रस्त्यांचे काँक्रीटीकरण करायचे आहे. त्यामुळे हे काम पावसाळ्यातदेखील करता येणे शक्मय आहे. ही कामे आता बंद करू नका, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आपल्याला पणजीतील रस्त्यांचे बांधकाम व स्मार्ट सिटी प्रकरणात लक्ष घालावे लागले, असेही मुख्यमंत्र्यांनी या प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले.