राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांच्याहस्ते उद्घाटन
प्रतिनिधी / म्हापसा
कुमाऊँ लिटररी फेस्टिवल, श्याम मेटॅलिक आणि लक्ष्मी कुप्पुस्वामी ट्रस्टद्वारे समर्थित भारतातील सर्वात प्रतिष्ठित आणि पहिला प्रवासी साहित्य महोत्सव शुक्रवार दि. 14 आणि 15 मे रोजी इएसजी पणजी येथे होणार आहे.
या दोन दिवसीय महोत्सवाचे उद्घाटन राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांच्याहस्ते होणार आहे. महोत्सवात संस्कृतीच्या पैलूंवर प्रकाश टाकणारी कला, सिनेमा आणि साहित्यावरील विविध सत्रे सादर होणार आहेत. या महोत्सवाची स्थापना 2014 मध्ये जागतिक ख्यातीस वकील, लेखक आणि सांस्कृतिक चॅम्पियन सुमंत बत्रा यांनी केली होती.
चित्रपट इतिहासकार आणि लेखक अमृत गांगर, ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक अनंत विजय, चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक राहुल रवैल, पेंग्विन रेंडम हाऊस इंडिया येथील एबरी पब्लिशिंग आणि व्हिंटेज प्रकाशन, प्रकाशक मिली ऐश्वर्या असे नामवंत वक्ते तसेच त्यांचे ग्रेस चंचलपती दास, इस्कॉनचे वरिष्ठ उपाध्यक्ष, बंगळुरू आणि अक्षय पात्र फाऊंडेशनचे उपाध्यक्ष उपस्थित राहतील. भारताच्या पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष विवेक देबरॉय हे प्राचीन मजकुराचे भाषण करतील तर लोकप्रिय चेतनेतील पौराणिक कथांचे स्थान या विषयावर मुख्य भाषण देतील असे आयोजक सुमंत बत्रा यांनी सांगितले.