ऑनलाईन टीम / तरुण भारत :
अवकाळी पावसामुळे अनेक जिल्ह्यात पिकांना फटका बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
ठाणे, पालघरसह राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळाला पाहिजे. सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. महसूल यंत्रणेने लगेच कामाला लागावे आणि पंचनामे करावेत असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
अधिक वाचा : औंधच्या ITI मध्ये मोफत व्यवसाय प्रशिक्षण
वाशीम, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पैठण, गंगापूर परिसरातील अनेक तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसाने काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मुंबई, ठाण्यासह उत्तर मध्य महाराष्ट्रावर ढगाळ वातावरण असल्यानं बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यादृष्टीने शिंदे यांनी प्रशासनाला सूचना केल्या आहेत.