काश्मीरच्या खोऱयात पुन्हा एकदा हाहाकार सुरू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून आमची काश्मीरातून जम्मू विभागात बदली करा, अशी मागणी करणाऱया हिंदू सरकारी कर्मचाऱयांना कसेतरी थोपविणाऱया सरकारसमोर आता नवे आव्हान निर्माण झाले आहे. अमरनाथ यात्रा आणि स्वातंत्र्य दिनाला कोणतीही वाईट घटना घडली नसल्याचा दिलासा मिळतो ना मिळतो तोच स्वातंत्र्य दिनाच्या दुसऱया दिवशी दोन काश्मिरी पंडित भावांवर सफरचंदाच्या बागेत काम करत असताना दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत सुनील कुमार नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला असून त्याचा सख्खा भाऊ गंभीर जखमी आहे. या घटनेमुळे काश्मीर खोऱयातील पंडित आणि इतर हिंदू विचलित होणे स्वाभाविक आहे. काश्मीर पंडित संघर्ष समितीचे प्रमुख संजय टिकू यांनी आता पंडितांनी काश्मीर खोरे सोडावे आणि दिल्लीत राहायला जावे असे आवाहन केले आहे. गेल्या वषी मे महिन्यात सरकारी कार्यालयात घुसून तहसील कचेरीत काम करणाऱया भट नावाच्या युवकाची दहशतवाद्यांनी गोळय़ा झाडून हत्या केली होती. तेव्हापासून सातत्याने कोठे ना कोठे अशा घटना घडतच आहेत. गत जून महिन्यात सुद्धा काही लोकांना टार्गेट करून मारण्यात आले आणि त्यामुळे जवळपास 1800 कुटुंबांनी काश्मीर खोरे सोडण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे जम्मूतील तेराशे कुटुंबांचा यामध्ये समावेश होता असे सांगितले जाते. सुरक्षारक्षकांच्या मनधरणीनंतर काही लोकांनी बेत बदलला मात्र बहुतांश लोक खोरे सोडून जाण्याच्या मानसिकतेला आले होते. त्यात आता स्वातंत्र्य दिनाच्या दुसऱयाच दिवशी घडलेल्या घटनेने टिक्कू यांनी काश्मिरी पंडितांना आवाहन केले आहे. त्याचा परिणाम काय होईल ते दिसून येईलच. मात्र, या आव्हानाला प्रतिसाद देऊन पंडितांनी खोरे सोडावे का? हा खरा प्रश्न आहे. अर्थात अशा प्रकारच्या हल्ल्यांमध्ये थेट बळी पडावे लागत असल्याने किंवा संपूर्ण घरदार उध्वस्त होत असल्याने जीव गेला तरी बेहत्तर पण आपली भूमी सोडू नका असे दुरून सांगणे सोपे आहे. प्रत्यक्ष परिस्थितीचा सामना करणे खूप कठीण आहे. अशा स्थितीत जगत असलेल्या या काश्मिरी पंडितांना सरकार काय सांगणार आहे? यापूर्वीही त्यांची सुरक्षा वाढवण्यात आल्याच्या घोषणा करण्यात आल्या. तरीही अशा घटना रोखणे ही साधी सोपी गोष्ट नाही. या घटना काही सांगून होत नाहीत. दहशतवादी त्याचे नियोजन करत असले तरीही त्याची पुरेशी माहिती मिळणे मुश्कील असते. त्यामुळे शेकडा 99 घटना घडल्यानंतरच समजतात. नंतर हळहळ करण्याशिवाय हाती काही उरत नाही. काश्मीर फाइल्स या चित्रपटानंतर सर्वसामान्य भारतीयांच्या मनातील जखमेवर आलेली साल पुन्हा एकदा ओरखडली गेली. आणि आता या घटनांनी ती जखम पुन्हा भळभळू लागली आहे. गेली 32 वर्ष देशातील सरकारला यावर मार्ग काढता आलेला नाही. कारण स्पष्ट आहे, तेथील परिस्थिती ही उर्वरित भारतापेक्षा पूर्णतः वेगळी आहे. धार्मिकदृष्टय़ा अल्पसंख्य असलेल्या हिंदू आणि पंडितांना तेथून हुसकावून लावले पाहिजे असे पाकिस्तानवादी लोकांना वाटते. त्यांच्या विरोधात संघटित शक्ती कार्यरत असते. त्यामुळे सरकारी कार्यालय असो की स्थानिक पोलीस, सर्वत्रच त्यांच्या बाबतीत आपलेपणाची भावना असते. त्यामुळेच अशा कारवायांना केवळ गुप्तचरच्या माहितीवर आधारित राहून रोखता येणे मुश्कील आहे. याचा अर्थ तिथले शंभर टक्के लोक काश्मिरी पंडितांच्या किंवा काश्मिरी हिंदूंच्या विरोधात आहेत असे मानण्याचेही कारण नाही. सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने नांदली पाहिजेत अशा विचाराची जनता तेथे स्वातंत्र्यपूर्व काळातही होती आणि आजही आहे. मात्र त्यांची संख्या हळूहळू घटत चालली आहे. त्याचे कारण भारतीय राज्यकर्त्यांचे चुकीचे धोरण आणि काश्मीरातील चुकीची वागणूक, हे सुद्धा आहे. हे आपलेच अपयश आहे. काश्मीर सारख्या राज्यातील परिस्थिती ही पूर्णांशाने वेगळी आहे. बऱयाच मोठय़ा घटकाला काश्मीर भारतापासून वेगळे करायचे आहे. जसे पाकिस्तान त्याकडे नजर लावून असतो तशाच पद्धतीने चीनची सुद्धा या भूभागावर नजर आहे. शिवाय अतिरेकी कारवाया करणाऱया संघटनांना जगभरातून पैसा मिळवण्यासाठी काश्मीरच्या स्वातंत्र्याचा लढा पुकारत राहणे गरजेचे बनलेले असते. त्यामुळेच इथल्या लष्कराविरोधात आणि काश्मिरी हिंदूंच्या विरोधात मोहिमा उघडल्या की बऱयाच लोकांचे आत्मे शांत होतात. अशा मंडळींना कायमची मुक्ती देणे राजकीय आणि जागतिक कारणांमुळेही सहज शक्मय होत नाही. त्यानंतर पंजाब, आसाम सारखे प्रश्न भारताने बऱयाच अंशी सोडवले. मात्र, काश्मीर प्रश्न अशा पद्धतीने सोडवता आलेला नाही. त्यात राजकीय, कुटनैतिक आणि गुप्तचर पातळीवरील अपयश हे मुख्य कारण आहे. राज्यकर्ते बदलले तरी काश्मीरबाबत एक सर्वमान्य रणनीती असली पाहिजे आणि त्याचे निर्णय घेणारी यंत्रणा पक्षविरहीत देशहिताची असली पाहिजे. राष्ट्राध्यक्ष बदलले तरी अमेरिकेचे धोरण बदलत नाही तसे काहीसे काश्मीर बाबतीत भारतात निश्चित धोरण असले पाहिजे. सीमेवर रडायला भारताच्या कानाकोपऱयातून सैनिक काश्मीरात जातात, त्यांचे प्राणही मोलाचे असतात. पण हल्ल्याच्या भयाने कोणी तिथे जाणे थांबवलेले नाही. पठाणकोट सारखे लष्करी तळावर हल्ले होऊन किंवा आत्मघाती हल्ले करून सैन्याचे मनोबल तोडता आले नाही. त्याचप्रमाणे काश्मिरी पंडित आणि हिंदूंची मानसिकता तुटू नये अशी स्थिती सरकारनेच निर्माण केली पाहिजे. भारतात राहण्याची मानसिकता असणाऱया काश्मिरी पंडित हिंदू असो की मुस्लिम त्या सर्वांवर विश्वास दाखवून भारत सरकारने एक लवचिक पण लक्ष्याधारीत धोरण आखण्याची नितांत आवश्यकता आहे.
Previous Articleकालिदासाचे मेघदूत.. एक खंडकाव्य (39)
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.