पन्हाळा-प्रतिनिधी
ऐतिहासिक पन्हाळगडाची गेल्या अनेक वर्षापासुन पडझडीची मालिका सुरु आहे.या पार्श्वभुमीवर गडाचे जतन व संवर्धन व्हावे यासाठी सर्वस्तरातुन मागणी होत आहे. यासाठी विविध संघटनांच्यावतीने अनेक निवेदने देवुन आंदोलने करण्यात आली. मात्र काही संघटनाच्या वतीने गडावर दहशत माजविन्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. यासाठी रविवारी पन्हाळा बंद ठेवुन स्थानिक नागरिक, व्यावसायिकांनी बाहेरील संघटनाच्या अवप्रवुत्तीचा निषेध व्यक्त केला.
पन्हाळ गडावर काय असावे, काय असु नये यासाठी तसेच गडाच्या संवर्धनासाठी स्थानिकांना विचारात न घेता परस्परच बाहेरील संघटनाच्या माध्यमातुन निवेदने देण्यात येत आहेत. याचा येथील व्यावसायिकांना व स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच मागील आठ दिवसापुर्वी काही विघ्नसंतोषीं लोकांच्याकडून गडावर दहशत माजविन्याचा प्रकार घडला.
यावेळी संबंधितावर गुन्हे दाखल करा अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी गावकऱ्यांनी बैठक घेवून बाहेरील संघटनाच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे रविवारी पन्हाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. आज पन्हाळ्यातील दुकाने, आठवडी बाजार, छोटे-मोठे स्टाँलधारकांनी आपले व्यवसाय बंद ठेवुन उत्सफुर्त प्रतिसाद नोंदविला. यावेळी गावातून रँली देखील काढण्यात आली. पन्हाळा बंद मुळे पर्यटकांसह, स्थानिक नागरिकांची मोठी गोची झाली होती. गडाच्या पायाथ्याशी असणाऱ्या बुधवारपेठ येथे रविवारचा आठवडी बाजार भरविण्यात आला होता.