29 डिसेंबरपर्यंत चालणार ः 23 दिवसांत 17 बैठका होणार
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
संसदेचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून सुरू होणार असून ते 29 डिसेंबरपर्यंत चालणार असल्याची माहिती केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विट करून दिली. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव कालावधीत होणाऱया या अधिवेशनादरम्यान विधिमंडळाचे कामकाज आणि इतर विषयांवर चर्चा अपेक्षित आहे. आगामी हिवाळी अधिवेशन 23 दिवसांचे असून त्यात 17 बैठका होणार आहेत. 18 जुलै ते 8 ऑगस्टपर्यंत चाललेल्या पावसाळी अधिवेशनात 22 दिवसांच्या कालावधीत 16 सत्रे झाली होती.
नोव्हेंबरच्या तिसऱया आठवडय़ात सुरू होणारे संसदेचे अधिवेशन यावेळी गुजरात निवडणुकीमुळे उशिराने सुरू होत आहे. हे अधिवेशन डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात जुन्या संसद भवनात सुरू होऊन महिनाअखेरपर्यंत सुरू राहणार आहे. गुजरात विधानसभेसाठी 1 आणि 5 डिसेंबरला मतदान होणार आहे, तर गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन्ही राज्यांतील मतमोजणी 8 डिसेंबरला होणार आहे. अर्थातच गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील निवडणूक निकालाचा विजयोत्सव केला जात असताना संसद अधिवेशन सुरू होईल. तसेच विशेष म्हणजे, उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून पदभार सांभाळत असतानाचे हे पहिलेच अधिवेशन असेल. हिवाळी अधिवेशनात राज्यसभा सभागृह कामकाजाचे अध्यक्षस्थान धनखड निभावणार आहेत.
महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा अपेक्षित
सरकारकडून संसदेच्या आगामी अधिवेशनात अनेक विधेयके मंजूर करण्याचा विचार सुरू आहे. तसेच विरोधक तातडीच्या विषयांवर चर्चेची मागणी करू शकतात. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दिवंगत सदस्यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. विद्यमान सदस्यांच्या निधनामुळे आगामी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीचे कामकाज श्रद्धांजलीपर भाषणे झाल्यानंतर तहकूब होण्याची शक्मयता आहे. नुकतेच निधन झालेल्या खासदारांमध्ये समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांचा समावेश आहे.
कोरोना प्रोटोकॉलशिवाय सत्र
कोरोनाची परिस्थिती पाहता आणि लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयातील बहुतांश सदस्य आणि कर्मचाऱयांना लसीकरण करण्यात आले असल्याने अधिवेशन कोणत्याही निर्बंधाशिवाय पार पडण्याची शक्मयता आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांत कोविडमुळे संसदेच्या अधिवेशनावर परिणाम झाला होता.
राहुल गांधी यांची अधिवेशनाला दांडी
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात काँग्रेस नेते राहुल गांधी सहभागी होणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी त्यावेळी भारत जोडो यात्रेत व्यग्र असल्याने ते या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहू शकणार नाहीत, असे जयराम रमेश यांनी म्हटले आहे. राहुल गांधींना यात्रा अर्धवट सोडून कुठेही जायचे नाही, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. या यात्रेमुळेच राहुल गांधी हिमाचल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही उतरले नव्हते. मात्र, काँग्रेसने स्टार प्रचारकांच्या यादीत राहुल आणि सोनिया गांधी यांच्यासह 40 बडय़ा नेत्यांची नावे समाविष्ट केली होती.