योगगुरु बाबारामदेव यांची ग्वाही ः कंपनीची उलाढाल एक लाख कोटी रुपयावर पोहोचणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बाबा रामदेव यांचा ग्रुप ऑफ कंपनी सध्या पाच लाख लोकांना रोजगार देत आहे. पुढील काही वर्षांत आणखी पाच लाख लोकांना रोजगार उपलब्ध होईल, असा दावा बाबा रामदेव यांनी केला आहे. ते म्हणतात की त्यांच्या कंपन्यांची उलाढाल यावेळी 40 हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे. येत्या पाच ते सात वर्षांत ही उलाढाल एक लाख कोटी रुपयांवर पोहोचणार असल्याचा दावाही यावेळी त्यांनी केला आहे.
उलाढाल पाचपट होईल
बाबा रामदेव यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, त्यांच्या समूह कंपन्यांची उलाढाल यावेळी 40 हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे. पाच ते सात वर्षांत ती एक लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचणार असल्याचा अंदाज त्यांनी मांडला आहे.
बाबा रामदेव म्हणाले की, सध्या त्यांचा समूह पाच लाख लोकांना रोजगार देत आहे. येत्या काही वर्षांत ते आणखी पाच लाख लोकांना रोजगार देणार आहेत. ते म्हणाले की, मी एक लाख शाळा भारतीय शिक्षण मंडळाशी संल करणार आहे. त्यामुळे रोजगाराच्या मोठय़ा संधी निर्माण होतील. याशिवाय देशात आणि जगात एक लाख पतंजली वेलनेस सेंटरही उघडण्यात येणार आहेत. यामध्ये अनेकांना रोजगारही मिळणार असल्याची माहिती दिली आहे.
पाम प्लांटेशन ही सर्वात मोठी कंपनी असेल
पतंजली देशातील खाद्यतेलामध्ये स्वयंपूर्णता मिळविण्यासाठी काम करत आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत 11,044 कोटी रुपयांची सबसिडी योजना जाहीर केली आहे. या दिशेने पुढे जात, पतंजली फूड्स 11 राज्यांतील 55 जिह्यांमध्ये 15 लाख एकरपेक्षा जास्त जमिनीवर पाम लागवडीची योजना राबवत आहे. ते म्हणाले की, येत्या काही वर्षांत पतंजली फूड्स ही देशातील सर्वात मोठी पाम लागवड करणारी कंपनी असेल असेही बाबा रामदेव म्हणाले.
पतंजलीच्या चार कंपन्या होणार लिस्ट
ते म्हणाले की, पतंजली ग्रुपची एकच कंपनी शेअर बाजारात सूचिबद्ध आहे. पुढील काही वर्षांत आणखी चार कंपन्या तेथे सूचीबद्ध होतील. या कंपन्यांमध्ये पतंजली आयुर्वेद, पतंजली मेडिसिन, पतंजली लाइफस्टाइल आणि पतंजली वेलनेस यांचा समावेश आहे.