पालकमंत्री गोविंद कारजोळ यांची अधिकाऱयांना सूचना : जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक
प्रतिनिधी /बेळगाव
रस्ते, रेल्वेमार्ग, शाळेच्या इमारती, वसतिगृहे आणि पिण्याचे शुद्ध पाणीपुरवठा करण्याबाबत सर्व अधिकाऱयांनी कामाला लागावे. प्रलंबित असलेली सर्व कामे तातडीने पूर्ण करावीत, असा आदेश पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी अधिकाऱयांना दिला. महत्त्वाचे म्हणजे अधिकाऱयांनी समन्वयाने ही सर्व कामे पूर्ण करावीत, असे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी आढावा बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये त्यांनी वरील सूचना केल्या.
जिल्हय़ातील खराब रस्ता कामांना मंजुरी मिळाली आहे. ते रस्ते अधिकाऱयांनी लक्ष देऊन पूर्ण करावेत. बेळगाव-धारवाड, कुडची-बागलकोट रेल्वेमार्गासाठी सर्व्हे झालेल्या जमिनी ताब्यात घेऊन तातडीने कामाला सुरुवात करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांनी अमृत योजना जाहीर केली आहे. ही योजना राबविण्यासाठी अधिक प्राधान्य द्यावे. जेणेकरून शहरासह ग्रामीण भागातील जनतेला या योजनेचा लाभ होईल. जिल्हय़ामधील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱयांसाठी 64 कोटी 54 लाख रुपये दिले गेले आहेत. एकूण 61 हजार 535 शेतकऱयांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा करण्यात आली आहे.
पावसामुळे अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरले होते. त्यांनाही नुकसानभरपाई दिली गेली आहे. जिल्हय़ातील 794 कुटुंबांना प्रति दहा हजारप्रमाणे 79 कोटी 40 लाख रुपये दिले गेले आहेत. ज्यांची घरे पडली आहेत त्यांना पहिला हप्ता दिला आहे. त्यांनी तातडीने घरे बांधून सर्व रक्कम घ्यावी, असे पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी आवाहन केले.
मुद्देनूर घटनेप्रकरणी अधिकाऱयांवर निलंबनाची कारवाई
रामदुर्ग तालुक्मयातील मुद्देनूर गावामध्ये दूषित पाण्याने अनेक जण अत्यवस्थ झाले. गटारीच्या खाली पिण्याच्या पाण्याची पाईप असल्यामुळे ही घटना घडली आहे. यामध्ये अधिकाऱयांचा निष्काळजीपणा आढळला आहे. त्यामुळे पीडीओ आणि कनि÷ अभियंत्यांना निलंबित करावे, असा आदेशही पालकमंत्र्यांनी दिला आहे.
स्वच्छ पाणीपुरवठा करण्याकडे लक्ष द्यावे, कोणीतीही घटना घडणार नाही, याची खबरदारी घ्यावी. पावसाळय़ापूर्वी सर्व जलकुंभांची स्वच्छता करून घ्यावी, सर्वत्र साफसफाई करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. यांनी संबंधित पीडीओ आणि इतर अधिकाऱयांना नोटीस दिल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले, बेळगाव-कित्तूर दरम्यान रेल्वेमार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आहे. याचबरोबर बागलकोट-कुडची रेल्वेमार्गासाठीही भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला स्मार्ट सिटीचे अधिकारी प्रवीण बागेवाडी, अप्परजिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, पोलीस उपायुक्त रविंद्र गडादी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.