शेतकऱयांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
मलप्रभा सहकारी साखर कारखान्याकडे शेतकऱयांची अजूनही कोटय़वधी रुपयांची बिले बाकी आहेत. कामगारांना ग्रॅज्युइटी देखील दिली गेली नाही. तेंव्हा याची चौकशी करून संबंधित साखर कारखान्याला शेतकऱयांची बिले आणि कामगारांची ग्रॅज्युइटी देण्यास भाग पाडा, अशी मागणी शेतकऱयांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
साखर कारखाना गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे सभासदांना साखर देखील देण्यात आली नाही. कारखान्यातील सेवानिवृत्त झालेल्या कामगारांना कोणत्याही प्रकारची रक्कम दिली गेली नाही. त्यामुळे हे कामगार अडचणीत आले आहेत. 2016-18 सालातील शेतकऱयांची बिले बाकी आहेत. 594 रुपये प्रतिटन फरक रक्कम दिली गेली नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. तेंव्हा तातडीने या शेतकऱयांची बिले देण्यास भाग पाडा, अशी मागणी शेतकऱयांनी केली आहे. यावेळी रामचंद्र पाटील, बसवंत खनजी, नितीन पाटील, सिद्धगौडा मोदगी, सागर पाटील, पंडित पाटील, राजशेखर गणाचारी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.