नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
काँग्रेस महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज, दिल्लीत जाऊन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर नाना पटोले यांनी महाराष्ट्रात काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष संपूर्ण देशाची हेरगिरी करत आहेत, असा घणाघात केला.
नाना पटोले यांनी आज दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पपंतप्रधान मोदी आणि भाजपवर घणाघाती टीका केली. यावेळी ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार हे पंतप्रधान मोदींना भेटले हे हा त्यांचा निर्णय आहे. त्यांचे कोणते नेते कोणाला भेटले यावर लक्ष देत नाही. हेरगिरी तर सध्या मोदी करत आहेत देशातील जनतेची…देशातील जनतेच्या गोपनीयतेला धोका पोहोचवण्याचं काम भाजप आणि मोदी करत आहेत. कोण कुठे जातं याची हेरगिरी काँग्रेस करत नाही.फडणवीस सरकारच्या काळात २०१६-१७ ला माझा स्वत:चा फोन टॅप झाला, भाजपच्या अनेक नेत्यांचे फोन टॅप झाले, पत्रकारांचे, अधिकाऱ्यांचे, राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोन टॅप झाले होते. तो विषय अधिवेशनात उपस्थित केला होता. त्याच्यासाठी याआधीच चौकशी समिती नेमली आहे आणि चौकशी सुरु आहे, असं नाना पटोले यांनी सांगितलं.
आज राहुला गांधी यांच्याशी चर्चा झाली. यावेळी केसी वेणुगोपलही उपस्थित होते. महाराष्ट्रात आज जी काय स्थिती आहे. इतर पक्षांची. त्यात काँग्रेसचा बेस सर्वाधिक आहे. त्यामुळे काँग्रेसचा बेस नियोजनबद्ध कसा वाढवायचा त्यावर सखोल चर्चा या बैठकीत झाली, असंही त्यांनी स्पष्ट केलं.दरम्यान, राज्यात काँग्रेसच्या काही मंत्र्यांना डच्चू देण्यात येण्याच्या चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला. मंत्र्यांना डच्चू देण्यात येण्याच्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही. सध्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार नाही. तशी काही चर्चा महाविकास आघाडीत चर्चा झाली नाही. पुढच्या काळात फेरबदल होणार की नाही याचा निर्णय हायकमांड घेईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
विधानसभा निवडणुकीला अजून वेळ आहे. तीन वर्ष बाकी आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढेल. सरकार आणि संघटना या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. त्याला सर्व पक्षांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे हा वाद संपलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे, यात काही वादच नाही, असं नाना पटोले म्हणाले.
Next Article विठ्ठल….! चराचरात…कणाकणात
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.