कामगार संघटनांचे आरोप; आमदार शशिकांत शिंदे यांची पत्रकार परिषदेत माहिती
प्रतिनिधी/ सातारा
महाराष्ट्रातले सरकार हे मुंबई महानगरपालिका निवडणुका झाल्या की लगेच पडेल, कारण शिंदे गटाचा वापर भाजपा हा सोयीप्रमाणे करते आहे. महाविकास आघाडी अभेद्य आणि भक्कमपणे या निवडणुकीत उतरणार आहे. न्यायालयाने जर मुख्यमंत्र्यांना डिस्कॉलफाय केल्यावर सरकार कोसळणार आहे, असा दावा राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शेंदे यांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, जे लोक पवारसाहेबांच्याबाबत बोलतात त्या लोकांची उंची काय, बोलतात किती अशीही खरमरीत टीप्पणी आमदार शशिकांत शिंदे यांनी केली. तसेच सातारा एमआयडीसी लोकप्रतिनिधी खंडण्या मागत आहेत, असे आरोपही कामगार संघटना करत असल्याचे आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
राष्ट्रवादी भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सरचिटणीस राजकुमार पाटील, अल्पसंख्याक सेलचे शफीक शेख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले, कंपन्यांवर दादागिरी केली जाते. त्यामुळे उद्योग येत नाहीत, असे बोलले जात आहे. मुथा कंपनी आपल्याकडे आहे. या कंपनीत साताऱयाच्या आसपासच्या गावातील मुलंच कामाला आहेत. ती मुलं पंधरा ते 20 वर्ष काम करतात. साताऱयात काही कंपन्या आहेत तिथे कंत्राटी स्वरुपात काम केले जाते. तिथे अनेक वर्षापासून काम करणाऱया काममागारांना कायम करावे. कायदा असा म्हणतो की नवीन कामगारांना किमान वेतनाच्या आधारावर पगार द्यावा. परंतु जुन्या कामगारांवर अन्याय का होतो. मी इंडस्ट्रीजच्या विरोधात नाही तर ही पिळवणूक बघवत नाही. आता मुलांच्या जागी महिला आणि मुली ठेवल्या जात आहेत. त्या कामगारांना वेठबिगाराप्रमाणे काम दिले जात आहे. भारत गिअरची तशी अवस्था आहे.
सातारा जिह्यात अनेक कंपन्यांना आहेत. काही कामगारांवर अन्याय सुरु असून ते माझ्याकडे आल्यामुळे या प्रश्नावर हात घातला आहे. दुसऱया कामगार संघटना अंतर्गत बोलतात की, काही लोकप्रतिनिधी खंडण्या मागतात असा आरोप करत होते. आमदार महेश शिंदे यांनी मागच्यावेळी भाषणात काय सांगितले याची कॉपी देवू का तुम्हाला, अशा शब्दात त्यांनी खुलासा करत ते पुढे एकाच व्यासपिठावर बसल्याबाबतच्या प्रश्नावर म्हणाले, स्व. अण्णासाहेब पाटील जयंतीच्या कार्यक्रमाचे यजमानपद माझ्याकडे होते. आमदार महेश शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्या सोबत आले. एकाच व्यासपीठावर आलो असलो तरीही माझी 35 वर्षाच्या मेहनतीची कमाई आहे. फोटो बघणाऱयांनी ऍगलने बघावा, असेही त्यांनी यावेळी सुचित केले.
निवडणूक प्रक्रिया कशी चालते ते सर्वांना माहिती आहे
मी चार वेळा आमदार होतो, या निवडणुकीत कशाचा प्रभाव झाला हे तुम्हालाही माहिती आहे. आम्ही कुठेतरी कमी पडलो. कोरेगाव मतदार संघातील आमदारांनी आकडेवारी दिली. ते सिटींग आमदार असल्याने संख्येत फरक पडतो. परंतु तेही माझेच कार्यकर्ते आहेत. आता सुद्धा यादी देऊ शकतो, लोक आहेत माझ्याबरोबर आहेत, काही लोकांचा प्रभाव असतो, संभाजीनगर येथे बदल केला ना. तेथे आमचे पॅनेलच नव्हते. सगळ्यांना माहिती आहेत देशात, राज्यात निवडणूक प्रक्रिया कशी होते ती. समृद्धी महामागं सगळीकडे जात नाही, अशीही गिरकी त्यांनी घ्यायला लावली. दरम्यान, माथाडी कामगारांच्या वराईच्या प्रश्नावर येत्या पंधरा दिवसात निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा दिला आहे.
लोकशाहीवरचा विश्वास उडेल असे निर्णय नकोत
शिवसेनेच्या चिन्हावरुनही आमदार शशिकांत शिंदे यांनी चर्चा केली. निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी दिलेला निर्णय हा तात्पुरता असला तरी लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल असे निर्णय नकोत. आज शिवसेनेच्या अंतर्गत वादामुळे ज्या चर्चा सुरु आहेत. सर्वसामान्य माणसांच्यामध्ये जावून कानोसा घेतला तर मला वाटत नाही पण विश्वासार्हता आहे. तशा प्रकारची परिस्थिती होवू नये. कालचा निर्णय हा तात्पुरता असला तरी त्या ज्या गटाने मागणी केली तो गट आहे का नाही हे ठरवले पाहिजे. घटनाक्रम पाहिले तर 16 जण अगोदर बाहेर गेले. नंतरच्या कालावधीत 37 संख्या झाली. विधानसभा अध्यक्षांकडे वेगळा गट तयार करुन द्यावा, असे पत्र दिले होते.
शिवसेना संपवण्यासाठीच शिंदे गट भाजपाला मिळाला
महाराष्ट्राच्या निवडणूकीत येणाऱया काळात घडामोडी झाल्या. गोरेगावच्या फिल्म इंडस्ट्रीज नोएडा, दिल्लीला नेण्याचा प्रयत्न सुरु आहे. बुलेट ट्रेन लोकांच्या आणि महाराष्ट्राच्या फायद्याची असेल तर स्वागतच पण त्यामध्येही त्रुटी आहेत. मेळावा हा आव्हानाचा असतो. शिवसेना हे निमित्त असते. मुंबई हे आंतराराष्ट्रीय स्तरावरच हब आहे. याच्यावर पुराव्या सकट बोलेण. मुंबईची एक वेगळी ओळख आहे. त्यांचं कल्चर, त्यांचं राहणीमान हे सुट होत नाही. मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट शिवसेना संपवण्यासाठी भाजपाला मिळाला आहे. महाराष्ट्रातील मुंबईतले शिवसेनेचे वर्चस्व आपल्या ताब्यात घ्यायचे. हा हेतू आहे. जेवढे आजच्या घडीला निर्णय घ्याच. तेवढय़ा पेक्षाने माणुससुद्धा उभा राहिल, असे त्यांनी सांगितले.