8 मे पर्यंत परराष्ट्र मंत्रालयाला माहिती देण्याची सूचना
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना संसर्गामुळे वैद्यकीय शिक्षण अर्धवट पूर्ण केलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना चीनमध्ये परतण्याबाबत विचार करण्याची तयारी चीनने दर्शविल्याची माहिती भारतीय दुतावासाने शुक्रवारी दिली. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्यासाठी चीनला जाणाऱयांना आपली माहिती 8 मे पर्यंत परराष्ट्र मंत्रालयाला द्यावी लागणार आहे. भारताचे परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस जयशंकर यांनी 25 मार्च रोजी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्याशी केलेल्या बैठकीनंतर चीनने सकारात्मक निर्णय घेतला आहे. यापूर्वीच्या चीनच्या निर्बंधांनुसार चिनी विद्यापीठांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारे भारतीय विद्यार्थी चीनमध्ये परतू शकत नव्हते. तथापि भारताने याप्रश्नी योग्य पावले उचलल्यानंतर चीनने अखेर नरमाईचे धोरण स्विकारल्याचे दिसून येत आहे.