केएसआरटीसी अधिकाऱ्यासमोर मांडली कैफियत : तातडीने अधिक बसफेऱ्या सुरू करण्याची मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
खानापूर तालुक्यातील बैलूर गावाला बसची समस्या गंभीर बनत चालली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शहराकडे येणे अवघड झाले आहे. तेव्हा तातडीने अधिक बस फेऱ्या सुरू कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.केएसआरटीसी अधिकाऱ्यांना हे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी रवींद्र गुरव, कुशाण्णा गुरव, लक्ष्मण झांजरे, पावणू गुरव, तुकाराम बिर्जे, संजय गुरव, यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.