प्रतिनिधी /बेळगाव
खंजर गल्ली येथील जुना बाजारमध्ये कचऱयाचे साम्राज्य पसरले आहे. गेल्या काही दिवसांपासून कचऱयाची उचल केली जात नाही. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली असून येथून ये-जा करणेही कठीण बनले आहे. तेंव्हा तातडीने येथील कचऱयाची उचल करावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांतून होत आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या खंजर गल्ली परिसरात जुनाबाजार (मोडका बाजार) आहे. त्या ठिकाणी कचऱयाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरून आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यासाठी मनपाने लक्ष देऊन कचऱयाची उचल करून स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे.